Aurangabad Corona News 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद शहरातील कोरोना संसर्ग गंभीर; केंद्रीय पथकाची पाहणी, कन्टेनमेंट झोन वाढविण्याचे आदेश

माधव इतबारे

औरंगाबाद : शहरात कोरोना संसर्गाच्या रुग्णांची वाढ गंभीर असून, वाढती संख्या लक्षात घेता कंटेनमेन्ट झोन तयार करा, गर्दीचे ठिकाणी विशेष लक्ष द्या, क्वारंटाईनची सुविधा पुन्हा सुरु करा, असे आदेश केंद्रीय पथकाने बुधवारी (ता.१०) प्रशासनाला दिले. औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून रोज तीनशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत होते. त्यानंतर मंगळवारी (ता. नऊ) मंगळवारी विक्रमी तब्बल ५५० रुग्ण आढळून आले. त्याची दखल घेत केंद्रीय पथकाने बुधवारी शहराला भेट दिली. पथकाने अंबिकानगर आरोग्य केंद्राच्या अंतर्गत सिडको एन- २, एन- ४ भागात पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी अनेक नागरिक विनामास्क फिरत असल्याचे पथकाच्या लक्षात आले. त्यामुळे पथकातील सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. नागरिकांना मास्कची सक्ती करा, नागरिकांवर निर्बंध घाला, कारवाई करा, असे आदेश दिले. तसेच रुग्णांची होणारी वाढ गंभीर असून, हा संसर्ग कमी करण्यासाठी कंटेनमेन्ट झोन पुन्हा तयार करा, एका कुटुंबातील एक पेक्षा जास्त सदस्य करोनाबाधित आढळून येत आहेत. त्यामुळे करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांना क्वारंटाईन करा क्वारंटाईन करा, पाच किंवा सात दिवसांनी त्यांची चाचणी करुन पुढील निर्णय घ्यावा, असे केंद्रीय पथकातील सदस्यांनी आदेश दिले आहेत, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.


ट्रेसिंग, ट्रॅकींग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट सूत्र वापरा
दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पथकाचे प्रमुख डॉ. रविंद्रन यांनी ट्रेसिंग, ट्रॅकींग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या सूत्राचा अवलंब करण्याची सूचना केली. यावेळी त्यांच्या सोबत पथकात सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. सुनील खापर्डे, डॉ. संकेत कुलकर्णी, राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी. नेमाने, आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शेळके, लसीकरण अधिकारी डॉ. विजय वाघ, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. शेळके उपस्थित होते.


अशा आहेत सूचना
-लोकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मास्कचा वापर करणे अत्यावश्यक आहे.
-मास्कचा वापर जेवढ्या जास्त प्रमाणात होईल तितक्या प्रमाणात संसर्ग कमी होईल.
-मास्क वापर बंधनकारक करून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा.
-चाचण्यांचे प्रमाण वाढवून कन्टेनमेंट झोन व्यवस्थापण अधिक प्रभावीपणे करावे.
-संपर्कातील व्यक्तीचा शोध, चाचण्या, उपचार, रुग्ण लवकर शोधण्यावर भर द्यावा.
-औद्योगिक परिसर, गर्दीची ठिकाणे अतिजोखमीच्या भागात चाचण्यांवर भर द्यावा.
-पुरेशा सुविधा असल्याशिवाय कुणालाही गृह विलगीकरणाची परवानगी देऊ नये.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : सामान्यांची एकीची वीण उसवू नये- शरद पवार

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT