Aurangabad Corona Updates 
छत्रपती संभाजीनगर

अवघ्या चार दिवसांत पावणेसहाशे रुग्ण! कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची झपाट्याने वाढ

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - कोरोनाचा आलेख झपाट्याने वाढत असून, गेल्या चार दिवसांत तब्बल पावणे सहाशे रुग्ण आढळून आले आहेत. यातील ४९१ रुग्ण शहरातील तर ८० ग्रामीण भागातील आहेत. रोज शंभरपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असल्यामुळे प्रशासनाने नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरु केली आहे.

शहर व जिल्ह्यात जानेवारीत कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा आकडा कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा आकडा वीसच्या आत आळा हाेता. पण गेल्या आठवड्यापासून रुग्णांची संख्या वाढतच आहे. गेल्या आठवड्यात कोरोनाचे रोज २० ते ३० रुग्ण आढळून येत होते. मात्र चार दिवसांत यात मोठी वाढ झाली आहे. ता.१६ ते १९ फेब्रूवारी या चार दिवसांत जिल्ह्यात ५१७ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यात शहरात रुग्णसंख्या जास्त आहे. शहराच्या विविध भागांत रुग्ण आढळून येत आहेत. सातारा-देवळाई भागात तर एकाच घरात तीन ते चार रुग्ण आढळून येत असल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे उपाययोजना करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. 

जास्त रुग्ण असलेल्या भागात सर्वेक्षण : कोरोना संसर्ग कमी होत असल्याने आरोग्य यंत्रणा काही काळ शांत होती. पण आता नव्याने संसर्ग वाढताच महापालिकेने शहरात काटेकोरपणे उपाययोजना सुरु केल्या आहेत. त्यानुसार नियम न पाळणाऱ्या मंगल कार्यालये, शिकवण्यांची तपासणी सुरु केली जात आहे. ज्या घरात दोन ते तीन रुग्ण आढळत आहेत, अशा भागात सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT