औरंगाबाद : रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी (ता. सहा) येस बँकेवर निर्बंध आणल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आरटीजीएस, एनईएफटी, चेक क्लिअरिंग ऑनलाइन सेवा व्यवहार ठप्प झाला आहे. त्यामुळे बँकेला मोठ्या अडचणींचा सामना करण्याची वेळ आली आहे.
‘आरबीआय’ने आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका ठेवत येस बँकेवर निर्बंध घातले. त्यामुळे येस बँकेसोबत ऑनलाइन सेवा घेणाऱ्या छोट्या सहकारी बँकाही अडचणीत सापडल्या आहेत. यात राज्यभरातील अनेक सहकारी व खासगी बँकांचा समावेश आहे. राज्यात सध्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचे काम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करून त्यांच्या बँक खात्यावर कर्जाची रक्कम जमा केली जात आहे. मात्र, येस बँकेवरील कारवाईमुळे ही प्रक्रिया थंडावली आहे.
दोन दिवसांपासून औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे. शुक्रवारी व शनिवारी (ता. ६ व ७) शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली कर्जमाफीची रक्कम अडकून पडली आहे. ती मोठी रक्कम असण्याची शक्यता आहे; तसेच बँकेचे आरटीजीएस, एनईएफटी, चेक क्लिअरिंग व्यवहारही लटकले आहेत. त्यामुळे खातेदारांना रोजचे व्यवहार करण्यास अडचण येत आहे.
हेही वाचा - कोरोनाला भिऊ नका, ही घ्या काळजी
लवकरच व्यवहार सुरळीत होईल
जिल्हा बँकेचे ऑनलाइन व्यवहार येस बँकेवर अवलंबून होते. ते व्यवहार बंद पडले आहेत. बँकेला येत असलेल्या अडचणीमुळे जिल्हा बँक दुसऱ्या बँकेची सेवा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेचे व्यवहार येत्या आठ दिवसांत सुरळीत होतील, अशी शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.