Vijayadashami Dasara 2022 esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : नवचैतन्याचा दसरा

मुहूर्तावर दीड हजार चारचाकींची विक्री, सातशे जणांचे घराचे स्वप्न पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जवळपास संपला असून राज्य शासनाने सर्व उत्सव व सणावरचे निर्बंध काढून टाकले आहेत. यामुळे दोन वर्षांनंतर नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झालेला असून यंदाचा दसरा हा बाजारात नवचैतन्य घेऊन आलेला आहे.

दसऱ्याच्या शुभ दिवसावर नागरिक सोने - चांदी, दुचाकी - चारचाकी, घर, प्लॉट तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करतात. यामुळे यंदा नवरात्र उत्सवात जवळपास दीड हजार चारचाकी वाहनांची विक्री झाली आहे. तर बुधवारी (ता.५) दसऱ्याच्या मुहूर्तावर ७०० चारचाकी वाहनांची डिलिव्हरी करण्यात येणार असल्याची माहिती धूत ह्युंदाईचे विकास वाळवेकर यांनी दिली. तर नवरात्र महोत्सवनिमित्त क्रेडाईच्या ड्रीम होम एक्स्पोत नागरिकांनी सातशे नवीन घरांसाठी नोंदणी केली आहे. बुधवारी प्रत्यक्षात पाचशे नवीन घरात नागरिक प्रवेश करणार आहेत.

घर खरेदीसाठी सुवर्णकाळ

कोरोना नंतरच्या बाजारात मोठी उलाढाल होत आहे. नवरात्र महोत्सवात अकराशे घरांची नोंदणी झाली आहे. यातून तब्बल ३०० कोटींहून अधिकचा व्यवसाय झाला आहे. दरम्यान जानेवारीनंतर रेपो रेट दर वाढणार असून गृहकर्जात वाढ होणार आहे. त्यामुळे दसऱ्यानंतर दिवाळीपर्यंत घर खरेदीसाठी सुवर्णकाळ असल्याचे ‘क्रेडाई’चे अध्यक्ष नितीन बगडिया यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद कोण? देशात ३५वी रँक मिळवत UPSCमध्ये यश

Navmi Havan 2025: नवमीला हवन करणे का गरजेचं आहे? जाणून घ्या सामग्री, विधी, मंत्र अन् मुहूर्त एकाच क्लिकवर

Women World Cup 2025: ४७ वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवणार? महिलांचा एकदिवसीय विश्‍वकरंडक आजपासून; भारत-श्रीलंका सलामीची लढत

Jammu Kashmir Tourism: पर्यटकांसाठी खुशखबर! आता जम्मू- काश्मीरमधील ७ प्रसिद्ध स्थळे पुन्हा सुरु, जाणून घ्या कोणती?

Mumbai News: धारावीचा पुनर्विकास मुंबईसाठी डबल धोक्याचा, वाहतूक कोंडी अन् पुराचा फटका बसण्याची भीती

SCROLL FOR NEXT