औरंगाबाद : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जवळपास संपला असून राज्य शासनाने सर्व उत्सव व सणावरचे निर्बंध काढून टाकले आहेत. यामुळे दोन वर्षांनंतर नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झालेला असून यंदाचा दसरा हा बाजारात नवचैतन्य घेऊन आलेला आहे.
दसऱ्याच्या शुभ दिवसावर नागरिक सोने - चांदी, दुचाकी - चारचाकी, घर, प्लॉट तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करतात. यामुळे यंदा नवरात्र उत्सवात जवळपास दीड हजार चारचाकी वाहनांची विक्री झाली आहे. तर बुधवारी (ता.५) दसऱ्याच्या मुहूर्तावर ७०० चारचाकी वाहनांची डिलिव्हरी करण्यात येणार असल्याची माहिती धूत ह्युंदाईचे विकास वाळवेकर यांनी दिली. तर नवरात्र महोत्सवनिमित्त क्रेडाईच्या ड्रीम होम एक्स्पोत नागरिकांनी सातशे नवीन घरांसाठी नोंदणी केली आहे. बुधवारी प्रत्यक्षात पाचशे नवीन घरात नागरिक प्रवेश करणार आहेत.
घर खरेदीसाठी सुवर्णकाळ
कोरोना नंतरच्या बाजारात मोठी उलाढाल होत आहे. नवरात्र महोत्सवात अकराशे घरांची नोंदणी झाली आहे. यातून तब्बल ३०० कोटींहून अधिकचा व्यवसाय झाला आहे. दरम्यान जानेवारीनंतर रेपो रेट दर वाढणार असून गृहकर्जात वाढ होणार आहे. त्यामुळे दसऱ्यानंतर दिवाळीपर्यंत घर खरेदीसाठी सुवर्णकाळ असल्याचे ‘क्रेडाई’चे अध्यक्ष नितीन बगडिया यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.