Aurangabad ground water increase farmers prefer pre seasonal chillies
Aurangabad ground water increase farmers prefer pre seasonal chillies sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : शेतकऱ्यांची पूर्व हंगामी मिरचीला पसंती

सकाळ वृत्तसेवा

चिंचोली लिंबाजी : परिसरात गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीने भूगर्भातील पाणीसाठा वाढल्याने यंदा येथील शेतकऱ्यांनी पूर्व हंगामी मिरचीला पसंती दिली असून रखरखत्या उन्हातही हे पीक तग धरून डौलाने उभे असल्याचे चित्र विविध शेतांमध्ये दिसून येत आहे.

चिंचोली लिंबाजीसह बरकतपूर, टाकळी अंतूर, लोहगाव, गणेशपूर, वाकी, नेवपूर, रेऊळगाव, करंजखेड तळनेर, घाटशेंद्रा, वाकद, शेलगाव आदि गावातून कमी अधिक क्षेत्रात मागील आठ दहा वर्षांपासून पूर्वहंगामी मिरची लागवड केली जाते. हळूहळू लागवडीचे क्षेत्र वाढत चालले असून यातून शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी मोठा आर्थिक हातभार दरवर्षी लागत आहे. गेल्या वर्षी संपूर्ण परिसरात अतिवृष्टी झाली. यातून शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले.

परंतु या पावसामुळे जमिनीतील पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने परिसरातील विहिरी तग धरून राहिल्याने याच कमी अधिक पाण्याच्या जोरावर परिसरातील शेतकऱ्यांनी यावर्षी शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन व मल्चिंग पेपरचा मोठ्या प्रमाणात वापर करून मिरची लागवड केली आहे. दरवर्षी मिरची पिकास प्रारंभी दोन ते तीन मोठ्या तोडणीनंतर चांगला दर मिळतो. पुढे उत्पन्नात वाढ होऊन बाजारात मिरची जास्त प्रमाणात आवक सुरु झाल्यानंतर दर कोसळतात. परंतु पहिला एखाद्या दोन मिरचीच्या तोडी लवकर झाल्यास चांगला पैसा हाती येतो, अशी माहिती येथील शेतकऱ्यांनी दिली आहे.

पावसाचे आगमन लवकर झाल्यास पूर्व हंगामी मिरचीचे चांगले पीक येते.तर पाऊस लांबल्यास काही कमी पाण्याचे क्षेत्र संकटात सापडते अशावेळी मिरचीचे उत्पादन कमी होते, असे असले तरी सुरुवातीला चांगला दर मिळत असल्याने मोठा आर्थिक फायदा होण्यास मदत होते.

-ज्ञानेश्वर साळुंके, शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने कोलकाताला दिला दुसरा धक्का; नारायणपाठोपाठ अर्धशतक करणारा सॉल्टही परतला माघारी

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT