छत्रपती संभाजीनगर

विनाकारण फिरताय! थेट होईल गुन्हा दाखल

सुषेन जाधव

औरंगाबाद : वाढत्या कोरोनाच्या (Corona) अनुषंगाने औरंगाबाद खंडपीठाने (Bambay High Court Aurangabad Bench) स्वतःहून दखल घेत काय कार्यवाही केली? अशी विचारणा करत त्यासंदर्भात माहिती जमा सादर करण्याचे आदेश नुकतेच दिले होते. त्यावर प्रशासनाची गोची झाली. याच अनुषंगाने पोलिस दलानेही चांगलीच कंबर कसली असून विनामास्क, विनाकारण घराबाहेर पडलेल्यांविरोधात थेट कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. यात ५२ ठिकाणी नाकाबंदी करत थेट गुन्हे दाखल करत ११३५ केसेस दाखल करुन ५ लाख १२ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती (Aurangabad Crime Branch Police) गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त रविंद्र साळोखे यांनी दिली.(Aurangabad Latest News Without Reason If You Walks Then Charges Will File)

अत्यावश्यक कारणाशिवाय फिरणाऱ्या १०१ जणांविरोधात पोलीस ठाण्यामध्ये भादंवि कलम १८८, २६९, २७० नुसार ४१ गुन्हे दाखल करण्यात आले असून सहायक वाहतूक विभागाकडून मोटार वाहन कायद्यानुसार संचारबंदी असूनही आवश्यक कारणांशिवाय फिरणाऱ्यांविरोधात तब्बल ११३५ केसेस करण्यात आल्या आहेत. यातून ५ लाख १२ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आल्याचेही श्री. साळोखे यांनी सांगितले. विशेष म्हणजे कारवाईची ही मोहीम यानंतरही अशीच सुरु राहणार असल्याचेही श्री साळोखे म्हणाले. पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, उपायुक्त दीपक गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तपासणी नाक्यावर नेमलेल्या पोलीस अधिकारी, अंमलदार, होमगार्ड यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT