Aurangabad : 30 लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे नुकसान sakal News
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे ३० लाख हेक्टरचे नुकसान

भरपाईसाठी लागणार २,४०० कोटी

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठवाड्यात जुलै, ऑगस्ट तसेच सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे सुमारे ३० लाख २० हजार ४७८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांतील नुकसानभरपाईसाठी सुमारे २,४०० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.

जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली. त्याचा खरीप पिकांना फटका बसला. मराठवाड्यात खरीपाच्या ४८ हजार २२ हजार ७९० हेक्टरवर पेरण्या झाल्या. त्यातील ३० लाख २० हजार ४७८ हेक्टरवरील पिके वाया गेली आहेत. जुलै-ऑगस्ट महिन्यांच्या नुकसानभरपाईसाठी शासनाने १ हजार ८ कोटी दिले. त्यानंतर सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी ५९९ कोटी, तर गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानीसाठी ७२ कोटींची मदत शासनाने केली आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरच्या नुकसानीपोटी २,४०० कोटींची मागणी विभागीय प्रशासनाने शासनाकडे केली आहे.

जिल्ह्यानुसार नुकसानीची टक्केवारी

औरंगाबाद : ६८ जालना : ६३

परभणी : ४३ हिंगोली : ६४

नांदेड : ७३ बीड : ६४

लातूर : ५५ उस्मानाबाद : ६७

सरासरी : ६३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Deploys 12 Nuclear Warheads: दुनियावालों हमें बचाओ! भारताने इतिहासात पहिल्यांदाच गोदामातून काढले १२ अणुबॉम्ब; पाकची भीतीने गाळण

नुकताच साजरा केला वाढदिवस; किती वर्षांची झाली तेजश्री प्रधान? फोटो शेअर करत सांगितलं स्वतःचं खरं वय

IND vs AFG: उद्यापासून वन-डेचा थरार! टीव्ही अन् मोबाईलवर LIVE मॅच कधी, कुठे पाहायची? जाणून घ्या वेळ

Kalyan: निर्दयीपणाचा कळस! जन्मानंतर अवघ्या सहा दिवसांतच चिमुकलीला कचऱ्यात टाकलं; कल्याणमध्ये हृदयद्रावक घटना

१.७ लाखांचा पगार... तरी महिनाअखेर खात्यात उरतात फक्त २,५२० रुपये; प्रत्येक मध्यमवर्गीयाने वाचावी अशी गोष्ट

SCROLL FOR NEXT