amc aurangabad
amc aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

या कारणामुळे महापालिकेने केला दंड

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद- बांधकाम करताना आच्छादनाचा वापर करावा, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे. त्यानंतरही अनेकांनी बांधकामे जाळी न लावताच सुरू केली आहेत. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने दोन बांधकामधारकांना शुक्रवारी (ता. 17) दंड लावत धक्का दिला. 

शहरातील हवेचे प्रदूषण धोकादायकरीत्या वाढले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकास्तरावर प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे बांधकामासाठीची खडी, वाळू, विटा रस्त्यावरच साठविले जाते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो तर दुसरीकडे बांधकामामुळे निघणारी धूळ प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे. या विरोधात महापालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला. आठ दिवसांपूर्वीच शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी जाळीचे आच्छादन लावूनच बांधकाम करावे, असे आवाहन केले होते.

हेही वाचा - 

मात्र त्यानंतरही मालमत्ताधारकांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे शुक्रवारी (ता.17) समोर आले. रेल्वेस्टेशन परिसरात गोळेगावकर कॉलनीत बांधकाम जाळीचे अच्छादन न लावताच सुरू होते. बांधकामाचे साहित्यही परिसरात पडलेले होते. त्यामुळे वॉर्डअधिकारी एस. आर. जरारे यांच्या पथकाने अरिहंत प्रॉपर्टीज यांना 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला. उस्मानपुरा येथेही अशाच प्रकारे सुरेश मालचंद सेठिया यांचे बांधकाम सुरू होते. त्यांनाही पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. 
 
विद्रुपीकरण करणाऱ्या एजन्सीवर गुन्हा 
दुभाजकाचे विद्रुपीकरण करणाऱ्या जाहिरात एजन्सीला देखील महापालिकेने दणका दिला आहे. सिडको एन-3 परिसरातील रस्त्यावर महापालिकेने दुभाजक बसवून रंगरंगोटी केली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या दुभाजकावर जाहिरातीचे पोस्टर चिटकविण्यात आले. त्यामुळे वॉर्डअधिकारी मीरा चव्हाण व स्वच्छता निरीक्षक सुनील दाभाडे यांनी माहिती घेतली असता, मयूर कासलीवाल यांनी महापालिकेची परवानगी न घेता पोस्टर चिटकवल्याचे समोर आले. कासलीवाल यांच्याविरोधात पुंडलीकनगर पोलिस ठाण्यात शहर विद्रुपीकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT