Aurangabad Municipal Smart City roads construction  sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद शहरात अडीच हजार किलोमीटरचे रस्ते!

महापालिका स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरात जीआयएस प्रणालीव्दारे सर्वेक्षण

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - महापालिका स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरात जीआयएस प्रणालीव्दारे सर्वेक्षण करत आहे. त्यात शहरातील प्रत्येक बारकावे टीपले जात आहेत. दोन लाख ३८ हजार ५१० झाडे शहरात असल्याची नोंद झाली आहे. त्यानंतर इतर बाबी देखील समोर येत आहेत. तब्बल अडीच हजार किलोमीटर लांबीचे रस्ते शहरात असल्याची नोंद घेण्यात आली आहे. जीआयएस सर्वेक्षणाअंतर्गत शहरातील ३०० बाबींची नोंद घेतली जात आहे.

सर्वेक्षणाचे पहिल्या वर्षीचे काम प्रगतिपथावर असून, त्यातून समोर आलेल्या बाबींची माहिती महापालिका अधिकाऱ्यांना दिली जात आहे. या संदर्भात उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले की, अ‍ॅमनेक्स कंपनीव्दारे हे काम केले जात आहे. ड्रोनच्या साह्याने शहराच्या इमेजेस घेऊन त्याची पडताळणी केली जात आहे. त्यात शहरात दोन हजार ५५५ किलोमीटरच्या रस्ते तयार झाले आहेत. डांबरीकरणाचे ५८१ किलोमीटरचे रस्ते असून, १ हजार ८४ किलोमीटरचे सिमेंटचे रस्ते बनविण्यात आले आहेत. खडीकरणाचे ६१ किलोमीटरचे तर ८२८ किलोमीटरचे कच्चे आहेत, असे श्रीमती थेटे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Monorail : मुंबईकरांसाठी मोठी बातमी ! मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद , MMRDA ने का घेतला निर्णय ?

Asia Cup 2025 : आशिया कपमधून माघार घेतल्यास पाकिस्तान बोर्ड लागणार भिकेला? तब्बल 'इतक्या' दशलक्ष डॉलरचं होईल नुकसान

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन; 75 व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

Karad Accident: दुर्दैवी घटना! 'कालेटेकच्या दोघांचा अपघाती मृत्यू'; भरधाव चारचाकीची मोटारसायकला पाठीमागून भीषण धडक..

मोठी बातमी! संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील ‘या’ लाभार्थींना आता दरमहा मिळणार २५०० रुपये; सामाजिक न्याय विभागाचा निर्णय; ऑक्टोबरपासून वाढीव लाभ

SCROLL FOR NEXT