File Photo
File Photo 
छत्रपती संभाजीनगर

अन्नपदार्थ वितरन समाजसेवेच्या नावाखाली बाहेर फिरणाऱ्यांचा सुळसुळाट

मनोज साखरे

औरंगाबाद - शहरांमध्ये लॉकडाऊन आहे; मात्र अशा परिस्थितीत लोक ऐकायला तयार नाहीत. बहुतांश नागरिक रस्त्यावर फिरत आहेत. दुचाकीवरून आणि चार चाकी वाहनातूनही मार्गक्रमण करीत आहेत.

खास करून अन्न पुरविण्याच्या नावाखाली सारा सुळसुळाट सुरू झाला आहे. त्यातही आरोग्याची खबरदारीही घेतली जात नसल्याने कुणालाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत आहे. त्यामुळे गैरफायदा घेणाऱ्यांना वेळीच आवरण्याची वेळ आहे. 

कोरोनाच्या (कोवीड-१९) पार्श्‍वभुमीवर गरजूंना अन्नपदार्थ वितरीत करण्यासाठी शहरात सुळसुळाट सुरु आहे. एखाद्या ठिकाणी अन्नपुरवठा करायचा असेल तर विशिष्ट सेवाभावी संस्था कार्यकर्ते एक अन्नपुरवठा करण्यासाठी जात आहेत. मात्र तिथे चहा आणि इतर पदार्थ देण्यासाठी इतर लोकही मोठी गर्दी करीत आहेत.

अन्नपदार्थ पुरवण्यासाठी एक किंवा दोन व्यक्ती पुरेशा असताना तेथे मात्र चार ते पाच किंवा गटागटानेही लोक गर्दी करीत आहेत. विशेषतः यातील काही आवश्‍यक कोणत्याही प्रकारची सुरक्षा बाळगत नसल्याचे चित्र आहे. अन्नपदार्थ वाटप केल्याचे बहुतांशी फोटो सोशल साईटवर अपलोड होत आहेत. त्यावरून असे दिसून येते की, अन्नपदार्थ देताना ठाराविक अंतर दोन व्यक्तीमध्ये ठेवण्यात आलेले दिसत नाही.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

संसर्ग टाळण्यासाठी एकमेकांच्या हाताला ही हात लागू नये ही एक खबरदारी घेताना दिसून येत नसल्याचेही फोटो आणि व्हिडिओ वरुन स्पष्ट होत आहे. हा धोका आपल्याला कोरोनाणाची लागण करण्यासाठी पुरेसा ठरू शकतो. त्यामुळे वेळीच खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. 

पोलिसहो, काळजी घ्या! 
पोलिसांना अन्न पुरवण्याचे काम ही काही सामाजिक संस्था करीत आहेत. तसेच काही नागरिकांकडूनही त्यांना फुड पॉकीट देण्यात येत आहेत; मात्र त्यांनाही फळ, अन्नपदार्थ पुरवताना विशेष काळजी घेतली जात नसुन काही फोटो तर अगदी खांद्याला खांदा लावुन सर्वजण उभे असल्याचे दिसुन आले आहेत. त्यामुळे पोलिसांनीही काळजी घेण्याची अधीक गरज आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

तपासणीचीही गरज 
समाजसेवेच्या नावाखाली बाहेर फिरणाऱ्यांचे पिक जोमात आहे. अन्न पुरविण्याच्या नावाखाली लॉकडाऊनमध्ये गैरफायदा घेत सुळसुळाट करणाऱ्यांवर वेळीच आवर घालण्याची गरज आहे. त्यांना प्रार्दुभाव होऊ शकतो, अशांकडूनही इतरांनाही धोका उत्पन्न होऊ शकतो. त्यामुळे अन्न वितरित करणाऱ्या करणाऱ्या खासगी व्यक्तींचीही तपासणी करुन आवश्‍यक खबरदारी घेण्याची गरज आहे. 

प्रशासनाने या कराव्या उपाययोजना 
झोपडपट्टीत अथवा गरजू लोकांना अन्नपुरवठा करण्यासाठी विशिष्ट कालावधीत ठरवावा. 
चहा देण्यासाठी अशा ठिकाणी एकावेळी केवळ एकाच व्यक्तीला परवानगी द्यावी. 
तोंडाला मास्क बांधून साबण आणि पाण्याने हात मग अन्नपदार्थांचे आणि चहाचे वितरण करण्यासाठी सांगावे. 
अन्नपदार्थ आणि इतर वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींसाठी वेळ ठरवून द्यावी. 
कोणीही यावे आणि पदार्थ वितरित करावे अशी परिस्थिती होऊ देता कामा नये. 
अन्नपदार्थ आणि चहाचे वितरण करताना पोलिसांचाही बंदोबस्त तेथे लागायला हवा. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT