Paithan water scarcity citizen buying water financial crisis sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : भाविकांवर 'पाणी विकत' घेण्याची वेळ

पैठणनगरीत पाणपोई सुरू होईना, बाटलीबंद पाण्यामुळे बसतोय आर्थिक भुर्दंड

चंद्रकांत तारू

पैठण : पैठण हे शहर शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी असून या नाथांच्या भूमीत नाथ महाराजांनी उन्हात तडफडत अवस्थेत पडलेल्या गाढवाला पाणी पाजून आदर्श घालून दिला. त्या नाथांच्या पुण्यभूमीत आज एकही पाणपोई नसल्याचे निदर्शनास आले असून भर उन्हात नागरिकांना घोटभर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

पूर्वी पैठण शहरात मुख्य रस्त्यासह जागोजागी दिसणाऱ्या पाणपोईमधून सर्वसामान्य नागरिकांना मोफत थंडगार पाणी पिण्यास मिळत होते. परंतु, सध्या पैठण परिसरातून पाणपोई गायब झालेली दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना भर उन्हात घोटभर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. अनेक शहर व ग्रामीण भागात उन्हाळा आला म्हणून अनेक स्वयंसेवी संस्था पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी साद घालताना दिसत आहेत. परंतु, माणसांना पिण्याच्या पाण्याची सोय कुणीही करायला तयार नसल्याचे चित्र आहे.

वाटसरूला पाणी पाजणे हे पुण्य कर्म मानले जाते. यासाठी अनेक व्यक्ती व स्वयंसेवी संस्था पूर्वी अशा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची सोय करत होत्या. परंतु, आजकाल या संस्था याबाबतीत उदासीन दिसून येत आहेत. त्यांच्या या उदासीनतेचा लाभ मिनरल वॉटर विक्रेत्यांना होत असून आता जार व्यावसायिकांचे पण चांगले फावले आहे. तहानलेल्या जिवांना घशाची कोरड भागविण्यास पंधरा ते वीस रुपये मोजावे लागत आहेत.

पैठण हे तालुक्याचे केंद्र असल्याने कामानिमित्त शहरात सर्वसामान्य, कष्टकरी नागरिक येतात. त्यांना तहान भागविण्यासाठी विकतचे पाणी घेणे कितपत परवडणारे आहे. हा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत पैठण शहरात फेरफटका मारला असता सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या सोई कुठेच दिसून येत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. मे महिन्यात येत्या आठवड्यात आणखी तापमान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतातरी शहरात ठिकठिकाणी पाणपोई सुरू करण्यासाठी कुणी पुढाकार घेईल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

वाटसरूंना पाणी पाजण्याच्या संस्कृतीचा विसर

पाणपोई नसल्याने हॉटेलमध्ये पाणी पिण्याखेरीज पर्यायच दिसत नाही. पाणी हेच जीवन, पाण्याचे काम पुण्याचे काम असे जरी म्हटले जात असले तरी आज पिण्याच्या पाण्याच्या कृत्रिम टंचाईने नाथांच्या नगरीत पाण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची अडचण झाली आहे. त्यामुळे वाटसरूस पाणी पाजण्याची आपली संस्कृतीच लयास जात असल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT