Aurangabad Shantiniketan Public School Parents agitation 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : पालकांचे शाळेसमोर ठिय्या आंदोलन

शांतीनिकेतन पब्लिक स्कूलची पालकांकडून तक्रार

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : सिडको परिसरातील शांतीनिकेतन पब्लिक स्कूलमध्ये गेल्या ३-४ वर्षांपासून शाळेत आवश्यक शिक्षक नाहीत. संस्थाचालकांशी संपर्कही होत नाही. व्यवस्थापनाची शाळा चालवण्याची मानसिकता दिसत नाही. शाळा विद्यार्थ्यांची टीसीही देत नाही. आम्हाला न्याय द्या अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्राथमिक शिक्षण विभागाकडे तक्रार केली. तसेच शाळेसमोरही सोमवारी ठिय्या आंदोलनही केले.

शांतीनिकेतन पब्लिक स्कूल ही स्वयंअर्थसहाय्यीत पहिली ते दहावी पर्यंत शाळा आहे. शाळेने एन ७ येथील एका शाळेसोबत विद्यार्थ्यांच्या समायोजनाची बोलणी केली. मात्र, ती फिस्कटल्याने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसण्याची वेळ आली आहे. शाळेत दोनच शिक्षक आहेत, मुख्याध्यापक नाही. आरटीईतून प्रवेशित विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे पुढे काय असा प्रश्न पालकांनी केला आहे. शाळा विद्यार्थ्यांची टीसीही देत नाही. असे पालकांचे म्हणणे आहे. दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा तर पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यवस्थापन शाळा चालवण्यास असमर्थ असल्याने सहकार्य करण्याची विनंती २२ पालकांनी खाजगी शाळा विभागाचे प्रदिप राठोड यांना निवेदन दिले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हापूसला आंब्याला लेबल लागणार? महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाची मागणी

Yavatmal Crime News : नग्न करून अमानुष मारहाण; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, चौघांना अटक

काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक लढवणार, उमेदवारही केला जाहीर; उद्या अर्ज भरणार

Mumbai News: ११३ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा! पूर्व-पश्चिम जोडणारा नवीन दुवा लवकरच आकारास येणार

आखाती युद्धाचा कांद्याला मोठा फटका; निर्यात ४५ टक्के घसरली, दर कोसळल्याने शेतकरी संकटात

SCROLL FOR NEXT