Aurangabad citizens Labor Colony house migrated
Aurangabad citizens Labor Colony house migrated  sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : कारवाई अटळ, अनेकांनी सोडली लेबर कॉलनीतील घरे

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाने बुधवारी सकाळपासूनच धडक कारवाईला सुरूवात करणार आहे. यामुळे कारवाई अटळ असल्याची खात्री पटल्याने आता लेबर कॉलनी येथील अनेक नागरिकांनी घरे रिकामी करणे सुरु केले आहे. रविवारी सायंकाळपर्यंत अनेकांनी घरे रिकामी केली. मात्र, घरांचा ताबा पुनर्वसनाची लेखी हमीनंतर देण्यात येईल, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या लेबर कॉलनीची जागा न्यायलयीन लढाईनंतर मोकळी होण्याचा मार्ग सुकर झाला. दोन दशकाच्या न्यायालयीन लढाईनंतर रहिवाशांना घरे रिकामी करावी लागणार आहेत. या वसाहतीतील बहुतांश घरे मोडकळीस आली आहेत. तर काही घरे मोडकळीस येऊन अति धोकादायक बनली आहेत. शासनाने १९.५३ एकर क्षेत्रात शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ३३८ सदनिका बांधल्या होत्या. सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांनी नियमानुसार त्या रिकाम्या करणे आवश्यक होते. परंतु तसे न करता इतर लेबर कॉलनीप्रमाणे या वसाहतीतील घरेही रहिवाशांच्या नावे करावीत, अशी मागणी केली. त्यासाठी न्यायालयात धाव घेतली.

अखेर जिल्हा सत्र, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांचा निकाला रहिवाशांच्या विरोधात गेल्याने घरे रिकामी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मोहीम राबविली जाणार होती. परंतु उच्च न्यायालयात १२ रहिवाशांची याचिका प्रलंबित असल्याने व त्या रहिवाशांनी १० मे रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत स्वत:हून घरे रिकामी करण्याचे आदेश देण्यात आल्याने मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान नुकसान टाळण्यासाठी रहिवाशांनी स्वत:च घरे रिकामी करणे सुरू केले आहे. शनिवारपासून ही प्रक्रिया सुरू असून रविवारी सायंकाळपर्यंत बहुतांश घरातील सामान इतरत्र स्थलांतरित झाल्याचे दिसून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार

SCROLL FOR NEXT