Aurangabad High Court  sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : न्यायालयाच्या आदेशानंतरच प्रशासनाचे पाण्याचे नियोजन सुरू

तीन दिवसाआडसाठी लागणार दोन महिने

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरात तीन दिवसांआड पाणी पुरवठा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाने तयारी सुरू केली असली तरी तीन दिवसाआड पाणी देण्यासाठी किमान दीड ते दोन महिन्यांचा वेळ लागू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.

शहरातील पाणीपुरवठा अनेक वर्षांपासून विस्कळित आहे. उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा मोठा त्रास सहन करावा लागला. शहराला पाणी पुरवठा करणारा नाथसागर काठोकाठ भरलेला असताना नागरिकांना मात्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते, यामुळे महापालिकेवरील रोष वाढत आहे. सध्या महापालिकेतर्फे काही भागात चार तर काही भागात पाच दिवसाआड पाणी दिले जाते. पाणी टंचाईसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.

त्यावर सुनावणी दरम्यान न्यायालयाने महापालिकेला तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाची काय तयारी आहे, याची माहिती घेतली असता अधिकाऱ्याने सांगितले की, न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा मान राखत महापालिकेने नियोजन सुरु केले आहे. शहरात पाणी साठवण्याची आवश्‍यक तेवढी सोय नाही. त्यामुळे तीन दिवसाआड पाणी देण्यासाठी अडचणी आहेत. असे असले तरी तीन दिवसांआड पाणी पुरवठा कसा करता येईल यासाठी नियोजन केले जात आहे. नागरिकांना रात्री-अपरात्री पाणी दिले जाऊ नये, याची देखील काळजी घ्यावी लागणार आहे. आगामी किमान दीड ते दोन महिन्यात तीन दिवसाआड पाणी दिले जाऊ शकते, असे अधिकाऱ्याने नमूद केले.

आता ८० ठिकाणी कामे

शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी काही कामे प्राधान्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात पूर्वी ७२ कामांचा समावेश होता. आता त्यात वाढ करण्यात आली असून, ८० ठिकाणी कामे केली जात आहे. नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत ही कामे केली जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Wall Collapse : मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमाला गालबोट; वादळी वाऱ्यामुळे अंगावर चिरा-विटांची भिंत कोसळून 5 ते 6 भाविक ठार, 12 जण जखमी

Pakistan Bomb Blast: पाकिस्तानमध्ये बाजारात भीषण बॉम्बस्फोट; नऊ जण ठार, ३० जखमी

Latest Marathi News Live Update : वाटणीच्या वादातून सख्ख्या भावांत हाणामारी; वृद्ध दांम्पत्यासह चौघे जखमी

Mumbai: धारावी पुनर्विकासासाठी नगरसेवक रणांगणात; ‘प्रलंबित’ प्रकरणांचा होणार अखेर निर्णय, तिढा सुटणार!

अंगणात तुळशी वृंदावन अन् दारात झोपाळा, 'ठरलं तर मग'च्या प्रियाने 'इथे' बांधलंय स्वप्नातलं फार्म हाऊस, रायगडमधील...

SCROLL FOR NEXT