file photo 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद जिल्ह्यात संभाव्य टंचाईग्रस्त गावाची संख्या सहाशेवर 

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या निवारणाची भिस्त टंचाइ निवारण कृती आराखड्याच्या अंमलबजावणीवर अवलंबून राहणार आहे. जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई भासू शकेल अशी ५६१ गावे आणि ५४ वाड्यांची संभाव्य पाणीटंचाई निवारण्यासाठी जानेवारी ते जुन २०२० साठी उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला गेला. 

यंदा ऑक्‍टोबर महिन्यात अवकाळी व अतिवृष्टीच्या स्वरूपात आलेल्या पावसामुळे पाणीटंचाईचे संकट राहणार नाही असे वाटले. मात्र झालेला हा पाउस सर्वदूर समान नसल्याने जिल्ह्यातील अनेक पाणीसाठ्यांची व भूगर्भाची तहान कायम राहिली. प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील एकूण ६५ मंडळांपैकी जवळपास २० ते २२ मंडळात गेल्या पाच वर्षात व यंदाही सरासरीइतका पाउस झाला नाही.

त्यामुळे जिल्ह्याचा सरासरी पाउस अपेक्षेच्या पुढे गेल्याचा दिसत असला तरी प्रत्यक्षात काही भागात यंदा पाणीटंचाईला सामोर जावे लागण्याची शक्‍यता व्यक्त केली जात होती. ही शक्यता गृहित धरून जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई भासू शकणाऱ्या ५६१ गावे व ५४ वाड्यांची संभाव्य पाणीटंचाई निवारण्यासाठी जानेवारी ते जुन २०२० साठी उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला गेला. जानेवारी ते मार्च व एप्रील ते जुन २०२० अशा दोन टप्प्यात या कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्याचे नियोजन केले.

 पहिल्या टप्प्यात ३१८ गावे व ४४ वाड्यांसाठी ६५२ योजनांसाठी अंदाजे आवश्‍यक खर्च १६ कोटी ९९ लाख प्रस्तावित करण्यात आला. तर दुसऱ्या टप्प्यात २४३ गावे व दहा वाड्यांच्या टंचाईच्या उपाययोजनांसाठी ४६० योजनांच्या पुर्ततेसाठी ११ कोटी ८३ लाख रूपये खर्च अपेक्षीत असल्याचे आराखड्यात नमूद करण्यात आले आहे. दोनही टप्पे मिळून जानेवारी ते जुन २०२० दरम्यान जिल्ह्यातील ५६१ गावे व ५४ संभाव्य टंचाईग्रस्त गावांसाठीच्या प्रस्तावित योजनांसाठी २८ कोटी ८२ लाख ८५ हजार रूपयांचा खर्च अपेक्षीत असल्याचे सुत्रांनी सांगीतले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT