चिंतेचे ढग हटले; बीडमध्ये
२ महिन्यांनंतर पावसाची हजेरी
--
बीड, ता. १३ : गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे चिंतेत सापडलेल्या जिल्ह्यातील बळिराजाला अखेर दिलासा मिळाला आहे. श्री गणेशाच्या आगमनापूर्वीच रविवारी (ता. १३) जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावल्याने करपणाऱ्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. मात्र, महावेध पोर्टलच्या अधिकृत पर्जन्यमान अहवालानुसार, जिल्ह्यात यंदा आतापर्यंत सरासरीच्या केवळ ५४.२ टक्केच पाऊस झाला असून मागील वर्षाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अत्यंत चिंताजनक आहे.
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान ५६६.१ मिमी सरासरी पाऊस अपेक्षित असतो; परंतु आजपर्यंत केवळ ३०६.६ मिमी (५४.२%) पावसाची नोंद झाली. मागील वर्षी याच तारखेपर्यंत तब्बल ४९२.९ मिमी म्हणजेच ८७.१ टक्के पाऊस झाला होता. मागच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १०.१ मिमी पाऊस झाला असून सर्वाधिक हजेरी गेवराई (१८.७ मिमी), आष्टी (१६.२ मिमी) आणि शिरूर कासार (१४.८ मिमी) तालुक्यात लागली आहे. आकडेवारीनुसार, केज तालुक्यात आजवर सर्वाधिक ८१.९ टक्के पाऊस झाला तर गेवराई (४०.६%) आणि वडवणी (४१.८%) तालुक्यांत परिस्थिती बिकट आहे. दोन महिन्यांच्या खंडानंतर आलेल्या या पावसामुळे विहिरी व भूजल पातळी वाढण्यास मदत होईलच, शिवाय वाळत असलेल्या पिकांना मोठा आधार मिळाला आहे. तथापि, धरणे आणि प्रकल्प भरण्यासाठी सप्टेंबरच्या उर्वरित दिवसांत मोठ्या पावसाची अत्यंत गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.