औरंगाबाद: कोरोना संसर्गाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत महापालिकेने शहरातील तब्बल आठ लाख ५५ हजार ६०१ जणांच्या कोरोना चाचण्या केल्या आहेत. यातील पाच लाख ८९ हजार ३७७ चाचण्या निगेटिव्ह आल्या असून, ९१ हजार १२४ जण पॉझिटिव्ह आले. मात्र एक लाख ७५ हजार १०० चाचण्यांचे काय झाले हा प्रश्न अनुत्तरीत आहेत. यासंदर्भातील घोळ दोन दिवसात संपविण्यात येईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
शहरात मार्च २०२० पासून कोरोना संसर्ग सुरू झाला. गेल्या १५ महिन्यात संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात ॲन्टीजेन व आरटीपीसीआर पद्धतीच्या चाचण्या केल्या. दुसऱ्या लाटेत संसर्ग वाढल्याने दररोज चार ते पाच हजारांपर्यंत चाचण्या केल्या जात होत्या. महापालिकेने मंगळवारी (ता.२९) दिलेल्या अहवालानुसार आत्तापर्यंत एकूण आठ लाख ५५ हजार ६०१ कोरोना चाचण्या केल्या आहेत. त्यापैकी पाच लाख ८९ हजार ३७७ निगेटिव्ह तर ९१ हजार १२४ पॉझिटिव्ह अहवाल आले. मात्र एक लाख ७५ हजार १०० चाचण्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले की निगेटिव्ह? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात विचारणा केली असता महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा जोगदंड यांनी सांगितले की, आकडेवारीत काही तरी गोंधळ झाला आहे. दोन दिवसांत त्यात दुरूस्ती केली जाईल.
आत्तापर्यंतच्या झालेल्या चाचण्या (ता. २९)
एकूण चाचण्या : ८,५५,६०१
निगेटिव्ह चाचण्या : ५,८९,३७७
पॉझिटिव्ह रिपोर्ट : ९१,१२४
बाहेरील पॉझिटिव्ह : ४,१३५
शहरातील पॉझिटिव्ह : ८६,९८९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.