covid 19 covid 19
छत्रपती संभाजीनगर

दिलासादायक! औरंगबादेतील कोरोना रुग्णांत घट; 24 तासांत सहाशेजण कोरोनामुक्त

सध्या एकूण ६ हजार ३२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज (ता. १८) एकूण ५६८ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. यात शहरातील १७४ व ग्रामीण भागातील ३९४ रुग्णांचा समावेश आहे. आज १८ जणांचा मृत्यू झाला. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ३८ हजार ३५ झाली. आजपर्यंत एकूण २ हजार ९६६ जणांचा मृत्यू झाला. आज ६०० रुग्णांना सुटी झाली. यात शहरातील १२८ व ग्रामीण भागातील ४७२ रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत १ लाख २८ हजार ७४३ रुग्णांना सुटी झाली. सध्या एकूण ६ हजार ३२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनाबाधितांचा मृत्यू -
घाटी रूग्णालयात म्हाडा कॉलनी, बन्सीलालनगर येथील पूरूष (३२), पैठण येथील महिला (५०), चित्ते पिंपळगाव (जि. औरंगाबाद) येथील महिला (६२), बीडकीन (ता. पैठण) येथील पूरूष (५३), शिवाजीनगर सिल्लोड येथील पूरूष (५५), पाचलेगाव (ता. पैठण) येथील महिला (६०), लाडगाव रोड, वैजापूर येथील महिला (६०), खोपेश्‍वर (ता. गंगापूर) येथील पूरूष (४५), खंडाळा (ता. वैजापूर) येथील महिला (६२), कन्नड येथील पूरूष (६५), नाईकनगर, बीडबायपास येथील पूरूष (५८), फुलंब्री येथील महिला (४५), ब्रिजवाडी ,चिकलठाणा येथील (५४), पैठणखेडा येथील महिला (४५) कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला. यासह खासगी रुग्णालयात चार रुग्णांचा मृत्यू झाला.

कोरोना मीटर
बरे झालेले : १२८७३
उपचार घेणारे : ६३२६
एकुण मृत्यू : २९६६

आतापर्यंतचे बाधित : १३८०३५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: घुसखोरांना बाहेर पाठवणार; मोदी, काँग्रेसने बिहारींचा अपमान केला, विरोधकांना विकास असह्य

ST Bus Ticket Price Hike: एल्फिन्स्टन पूल कामाचा प्रवाशांना भुर्दंड, एसटी तिकीट दरात २० रुपयांची वाढ!

दूध, तूप अन् लोणी होणार स्वस्त! मदर डेअरीचा मोठा निर्णय, GST कपातीनंतर दरात केले बदल

High Court: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होत आहे का? उच्च न्यायालय, राज्य शासनाला तीन आठवड्यात मागविले उत्तर

'IND vs PAK सामना १५ ओव्हरनंतर बंदच केला, कारण...', सौरव गांगुलीचं मोठं व्यक्तव्य

SCROLL FOR NEXT