Crime  sakal
छत्रपती संभाजीनगर

Crime news : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तरुणाला कारावास, दंड

मुलीच्या आईने सेलू पोलिसांत २२ मार्च २०२२ ला तक्रार दाखल केली.

सकाळ वृत्तसेवा

परभणी : सेलू शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याबद्दल वैभव बाबाराव कदम या आरोपीस विशेष न्यायालयाने गुरुवारी २० वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.सेलूतील एका कुटुंबाच्या घरामध्ये कोणी नसल्याचे पाहून वैभव कदम या तरुणाने प्रवेश केला आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला, जीवे मारण्याची धमकी दिली.

मुलीच्या आईने सेलू पोलिसांत २२ मार्च २०२२ ला तक्रार दाखल केली. संशयिताविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक आर.जी.गाडेवाड यांनी कारवाई करीत विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. विशेष न्यायालयाने संबंधित आरोपीस पोस्को या कायद्यांतर्गत २० वर्षे कारावास, १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कारावास, अन्य कलमान्वये १ वर्ष कारावास, ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली.

सरकारी अभियोक्ता म्हणून अँड.आनंद गिराम यांनी काम पाहिले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सानप, उपनिरीक्षक चव्हाण, अंमलदार वंदना आदोडे, अंमलदार गजानन गवळी यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकांकडून छळ… दिल्ली मेट्रो प्लॅटफॉर्मवरून उडी मारत जीवन संपवलं! शेवटचं वाक्य अंगावर काटा आणणारं

Latest Marathi News Update LIVE : जळगावमध्ये शिवारात 23 लाखांची 'गांजाची शेती' केली उद्ध्वस्त

Bihar Probable Ministers List : नितीशकुमार यांच्या नवीन मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी आली समोर!

Amravati Crime: अमरावती हादरली! युवकाची पूर्ववैमनस्यातून हत्या

Bicycle Riding: 'सोलापूरच्या चौघांनी के२के सायकल रायडिंगमध्ये रचला इतिहास'; काश्मीर ते कन्याकुमारी १६ दिवसांमध्ये ४२०० किमी प्रवास पूर्ण..

SCROLL FOR NEXT