Devendra Fadnvis sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : सत्ताबदल नाही, तर व्यवस्थाबदलासाठी मोर्चा - फडणवीस

सकाळ डिजिटल टीम

औरंगबाद : सध्या शहरातील पाणी प्रश्न गंभीर बनला आहे, यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून पाणीटंचाईविरोधात रस्त्यावर उतरत जलआक्रोश मोर्चा काढण्यात आला, ज्यामध्ये हाजारोच्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. यादरम्यान बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

या मोर्चाचं टोक दिसत नाहीये हा संभाजीनगरच्याजनतेचा आक्रोश आहे, सरकार आणि महानगरपालिकेतील शिवसेनेने आश्वासन दिली. भावनेचं राजकरण केलं पण थेंबभर पाणी देऊ शकले नाहीत. हा आक्रेशाचा समना सरकारला करावा लागेल, संभाजीनगरला पाणी मिळाल्याशिवाय आमचा संघर्ष संपणार नाही असे फडणवीस म्हणाले.

पण फक्त नाटक करण्यासाठी ते येत असल्याची टीका खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती, त्यावर बोलताना फडणवीस यांनी जनतेसाठी संघर्ष करणे माहीत नाही, ते तिथं बसून जे करतायत ती नौटंकी असल्याचे म्हटले आहे.

आम्ही याच मार्गाने गोपिनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला आणि सत्ताबदल केला होता, त्याच मार्गाने आम्ही चाललो आहोत, आता सत्ताबदलाकरता नाही, तर व्यवस्थाबदलासाठी मोर्चा असल्याचे फडणवीस म्हणाले. सत्ता बदलायची त्यावेळी बदलू पण आज भ्रष्ट व्यवस्था बदलून सामान्य माणसाला पाणी द्यायचं आहे असेही ते म्हणाले.

पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, हा भाजपचा मोर्चा नसून संभाजीनगरच्या लोकांचा मोर्चा आहे, त्यामुळे हा जगनाथाचा रथ आहे ज्याला ओढायचा त्याने ओढावा , पाणी मिळाल्याशिवाय संघर्ष बंद होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Decision about World Cup: भारत विश्वविजेता झाल्याच्या पाच दिवसांतच ‘ICC’ने विश्वचषकाबाबत घेतला मोठा निर्णय!

India Pakistan Conflict: पाकिस्तान खरंच अणुचाचण्या करतंय का? संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडली भारताची भूमिका

MahaBiz Summit : राज्यातील उद्योजकांना मिळणार जागतिक संधींचे व्यासपीठ ‘जीएमबीएफ’ व ‘एमईडीसी’ यांच्या संयुक्त विद्यमाने दुबईत ‘महाबिझ’चे आयोजन

Mahar Vatan Land Scam : मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारानंतर खळबळ; 'महार वतन जमिनी बळकावणाऱ्यांची सीबीआय चौकशी करा' महार वतन परिषदेची मागणी

Pune Traffic : सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलावर रिक्षा-कारचा तिहेरी अपघात! मोठी वाहतूक कोंडी, नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT