छत्रपती संभाजीनगर

फोटो 09 फोटोओळी:अंबड:नायब तहसीलदार महेंद्र गिरगे यांना मागण्याचे निवेदन देताना नागरिक

CD
अन्नसुरक्षेचे नियम सर्व धर्मीयांसाठी समान लागू करण्याची मागणी अंबड, ता. ५ (बातमीदार) : अन्नसुरक्षेचे नियम केवळ हिंदू सणांनाच लागू न करता सर्व धर्मीयांसाठी समान पद्धतीने लागू करण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे शुक्रवारी (ता. ४) करण्यात आली. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आगामी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्नसुरक्षेसंदर्भात काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणे अत्यंत महत्त्वाचे असून, या नियमांचे स्वागतच आहे, असे निवेदनात म्हटले आहे.मात्र, या संदर्भात केवळ हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांमधील महाप्रसाद, भंडारा आणि अन्नदान यांचाच विशेष उल्लेख करून परवाने, नोंदणी तसेच कारवाईचा इशारा देणे ही भूमिका पक्षपाती असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अन्नसुरक्षेचे नियम आवश्यक असतील, तर ते धर्म, पंथ किंवा जात असा कोणताही भेद न करता सर्व धर्मीयांच्या अन्नदानासाठी समानपणे लागू करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.या निवेदनावर श्रीमंतराव शेळके, डॉ. राजेंद्र भाला, रवींद्र अंबिलवादे, जगदीश जोशी, संजय देशमुख, गीताविलास खुंटेफळकर, बाबासाहेब वैराळ, संजय जगधने, कैलास शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Google Android: गुगलने आणले ५ हाय-टेक फीचर्स! कारमध्ये फोन वापरताना चक्कर येणे बंद; 'मोशन असिस्ट' फीचर कसे करेल काम?

छबीदार छबी मी तोऱ्यात उभी! यंदाची दहीहंडी तिने गाजवली; गौतमी पाटील नाही मग ही नवी डान्सर आहे तरी कोण?

Dahi Handi Accident Mumbai : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला

Marathi News Live Updates: एक हजार शाळा मॉडेल स्कूल करण्याचं उद्दिष्ट- सुनेत्रा पवार

ऑनलाइन Grocery खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, काय बदलणार?

SCROLL FOR NEXT