3farmer_23.jpg 
छत्रपती संभाजीनगर

नियमित कर्ज फेडणाऱ्या सभासदांना मिळणार वाढीव पीककर्ज

सुनील इंगळे

औरंगाबाद : सतत तीन वर्ष एकही कर्जाचा हप्ता न चुकवता कर्ज फेडणाऱ्या सभासदांना २० टक्के वाढीव पीककर्ज (Crop Loan) देण्यात येणार असल्याचे जिल्हा बॅंकेचे (Aurangabad District Cooperative Bank) अध्यक्ष नितीन पाटील (Nitin Patil) यांनी सांगितले. मंगळवारी (ता.दहा) पत्रकार परिषदेत जिल्हा बॅंकेच्या आर्थिक वर्षांची माहिती नितीन पाटील दिली. यावेळी ते म्हणाले की, बॅंकेच्या वतीने जिल्ह्यातील शेतकरी (Farmer) सभासदांना अल्पमुदत पीक कर्ज वाटप करण्यात येत आहे. यात २०२१-२२ खरीप हंगामात ४१९.७२ कोटीचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य असून आतापर्यत ३२३.७२ कोटीचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. तर २०२०-२१ला ५२४ कोटी रुपयाचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

दरम्यान गेल्या वर्षीचे कर्ज वाटपाची ७० टक्के वसुली झाली असून नियमीत कर्ज फेडणाऱ्या सभासदांना मिळणार २० टक्के वाढीव पीक कर्ज देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेला असल्याचे नितीन पाटील यांनी सांगितले. तसेच नानाची देशमुख कृषी संजीवनी योजना(पोकरा) अंतर्गत जिल्ह्यातील २४ सभासदांना ५.१५ कोटीचे कर्ज देण्या आले असून १७ सभासदांना २.१२ कोटीचे अनुदान प्राप्त झाले असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी अर्जुन गाढ़े, जावेद पटेल, अभिषेक जैस्वाल, दिनेश परदेशी, आर. आर. शिंदे,अजय मोटे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT