Farmer Destroy Banana Garden In Paithan Taluka of Aurangabad esakal
छत्रपती संभाजीनगर

मुलीचे लग्न होईल या आशेवर लावलेली केळीची बाग भाव नसल्याने तोडली

शेतकऱ्याने या वर्षी सव्वा दोन लाख रुपये खर्च करून दोन एकर शेतात केळी लावली होती.

अनिल गाभूड

विहामांडवा (जि.औरंगाबाद) : शेतकऱ्यांना नेहमीच कोणत्याना कोणत्या संकटांचा सामना करावा लागतो. कोरोना, अतिवृष्टीमधून शेतकरी सावरत असताना आता मालाला भाव मिळत नसल्याने उभी पीक भुईसपाट करण्याचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. पैठण (Paithan) तालुक्यातील हिरडपुरी येथील शेतकरी लक्ष्मण राक्षे यांनी या वर्षी सव्वा दोन लाख रुपये खर्च करून दोन एकर शेतात केळी (Banana Garden) लावली होती. यामधून येणाऱ्या उत्पन्नातून मुलीचे लग्न करता येईल, ही आशा त्यांना होती. म्हणून त्यांनी चार महिन्यांपूर्वी कर्ज काढून मुलीचे लग्न केले. आता केळीचे उत्पन्न आल्यावर कर्ज फेडता येईल, अशी आशा त्यांना होती. मात्र अखेर त्यांची (Aurangabad) निराशाच झाली. पीक तर आले, परंतु पिकाला भाव मिळेना.

व्यापारी देखील पीक नेण्यासाठी येत नसल्याने अखेर त्यांनी उभ्या केळीचे पीक जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला. सरकारने अल्पभूधारक, गरीब शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती ते सरकारकडे करित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''मी निवडून आलोय, आत जाऊ द्या!'' फरशी कारागीराला पोलिसांनी बाहेरच अडवलं; माजी उपनगराध्यक्षाचा केला पराभव

Solapur Cyber Crime : आरटीओ ई-चलानच्या नावाखाली मोबाईल हॅक; ८.४९ लाखांची ऑनलाईन फसवणूक!

Pachod Crime : वाढदिवसाला डीजे वाजवण्यावरून वाद ; दुचाकी पेटवणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले!

सोलापुरात गुन्हा दाखल! मी पत्रकार आहे म्हणून शिवभोजन केंद्रचालकांकडून दरमहा घेतला हप्ता; घराचे बांधकाम सुरु असल्याने हप्ता वाढवून मागितला अन्‌...

Karad Krushi Pradarshan : एआय तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकरी आर्थिक सक्षम होणार; कऱ्हाड कृषी प्रदर्शनात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा विश्वास!

SCROLL FOR NEXT