गंगापूर : येथील बाजार समितीच्या लिलावामध्ये कांदा कमी दराने खरेदी केला जात असल्याचे सांगत संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. २७) कांदा लिलाव बंद पाडून जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांच्या मध्यस्तीने दुपारनंतर लिलावाला सुरवात झाली. राज्यातील इतर बाजार समित्यांमध्ये मिळणाऱ्या भावाच्या तुलनेत येथील भाव खूप कमी मिळत आहे. (Aurangabad News)
शिवाय दोन दिवसांच्या दरात प्रति क्विंटल मागे ५०० रुपये कमी मिळत असल्याचे कारण शेतकरी आक्रमक झाले होते. कमीत कमी १ हजार ६०० रुपये क्विंटलचा दर कांद्याला मिळावा, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत व्यापाऱ्यांचा निषेध केला. संतप्त शेतकऱ्यांनी गंगापूर-वैजापूर मार्ग काही काळ रोखून धरल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या वतीने बाजार समिती अधिकाऱ्यांमध्ये मध्यस्ती केल्याने लिलाव पुन्हा सुरळीतपणे सुरू झाला. यावेळी शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.