sakal
sakal
छत्रपती संभाजीनगर

बांधावर जाऊन व्हावेत नुकसानीचे पंचनामे- अंबादास दानवे

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : अतिवृष्टीने झालेल्या शेतीच्या नुकसानीची माहिती स्थानिक पातळीवर कार्यरत तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक अशा यंत्रणेद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे केले जावेत, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.

याबाबत आमदार दानवे यांनी म्हटले आहे की इ पीक पाहणी ॲपमध्ये पिकांची, नुकसानीची माहिती भरताना अनेक अडचणी येत आहेत. इन्शुरन्स कंपन्यांनी ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केली तरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल असे सांगण्यात आल्याने १० टक्के सुद्धा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. यासाठी याकरिता स्थानिक पातळीवर कार्यरत असलेले तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक अशा यंत्रणा राबवून ज्या शेतकऱ्यांचे खरेच नुकसान झालेले आहे, त्यांचे जिओ टॅगिंग करून नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांना निर्देशित करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

निवेदनात केलेल्या मागण्या

  • बाधित शेतकऱ्यांना २ हेक्‍टरपर्यंत अनुदान देण्यात यावे.

  • घर पडलेल्यांना घरे बांधून देणे आवश्यक आहे.

  • सिंचन विहिरीची हमी योजनेतून बांधकाम दुरुस्ती करावी.

  • विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना विमा मंजूर करावा.

  • रस्ते पूल वाहून गेले आहेत त्यांची दुरुस्ती करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT