sakal
छत्रपती संभाजीनगर

बांधावर जाऊन व्हावेत नुकसानीचे पंचनामे- अंबादास दानवे

आमदार अंबादास दानवे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : अतिवृष्टीने झालेल्या शेतीच्या नुकसानीची माहिती स्थानिक पातळीवर कार्यरत तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक अशा यंत्रणेद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे केले जावेत, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.

याबाबत आमदार दानवे यांनी म्हटले आहे की इ पीक पाहणी ॲपमध्ये पिकांची, नुकसानीची माहिती भरताना अनेक अडचणी येत आहेत. इन्शुरन्स कंपन्यांनी ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केली तरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल असे सांगण्यात आल्याने १० टक्के सुद्धा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. यासाठी याकरिता स्थानिक पातळीवर कार्यरत असलेले तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक अशा यंत्रणा राबवून ज्या शेतकऱ्यांचे खरेच नुकसान झालेले आहे, त्यांचे जिओ टॅगिंग करून नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांना निर्देशित करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

निवेदनात केलेल्या मागण्या

  • बाधित शेतकऱ्यांना २ हेक्‍टरपर्यंत अनुदान देण्यात यावे.

  • घर पडलेल्यांना घरे बांधून देणे आवश्यक आहे.

  • सिंचन विहिरीची हमी योजनेतून बांधकाम दुरुस्ती करावी.

  • विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना विमा मंजूर करावा.

  • रस्ते पूल वाहून गेले आहेत त्यांची दुरुस्ती करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: एसी लोकलची संख्या वाढणार, १२० एसी लोकल रुळांवर धावणार, प्रवाशांना दिलासा मिळणार; पाहा वेळापत्रक

गुलाबी साडी ते बॉलिवूड! संजू राठोडच्या गाण्याने पुन्हा जिंकली चाहत्यांची मनं, Viral Video

Jyoti Waghmare: उद्धव ठाकरेंचा दौरा म्हणजे...वरातीमागून घोडे! संजय राऊत दुतोंडी गांडूळ; खासदार ज्योती वाघमारे यांनी केली टीका

Latest Marathi News Update : रिसोडमध्ये कांचन-अरुणावती नद्यांना पूर; पेरणी उद्ध्वस्त, शेतकऱ्यांवर पुन्हा संकट

Mumbai Local: धक्का लागला, माफी मागितली... तरी आरोपीने केला पाठलाग आणि चाकू हल्ला; मुंबई लोकलनंतर पुन्हा थरार

SCROLL FOR NEXT