sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : शेतकरीही उतरणार बाजार समितीच्या रिंगणात

तयारी जोरात : सिल्लोड-सोयगावात निवडणुकीचा धुरळा लवकरच

सकाळ वृत्तसेवा

सिल्लोड : सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या रणांगणाची तयारी तालुक्यात सुरू झाली आहे. मागील काळात शासनाने शेतकऱ्यांना बाजार समिती निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क दिला होता. परंतु तो निर्णय सिल्लोड तालुक्यातील सेवा संस्थांना लागू झाला नव्हता. आता बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला असून, ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातून शेतकऱ्यांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळे या निर्णयानंतर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया पार पडणार असल्याने, सिल्लोड व सोयगाव तालुक्यात या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.

शेतकऱ्यांसाठी असलेल्या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना प्रतिनिधित्व करण्यासाठी अडचणीचे होत होते. परंतु या निर्णयानंतर आता शेतकऱ्यांना बाजार समितीच्या निवडणूक रिंगणात उतरता येणार आहे. राज्यातील राजकारणात दररोज बदलत असलेल्या घडामोडी बघता, कोण कोणत्या पक्षात तर कोणत्या पक्षाचे पदाधिकारी कोठे आहे. याचा कयास सामान्य कार्यकर्त्यांना चक्रावून टाकणारा आहे.

नेत्यांच्या खेळाचा सारीपाट बघता आता स्थानिक पातळीवरील निवडणुकांची परिस्थिती देखिल वेगळी नाही. सहकार क्षेत्रातीत निवडणुका बघता अनेक पक्षातील पदाधिकारी एकत्र येऊन सांगड घालून पॅनेल उभे करतात. त्यामुळे आता सिल्लोड तालुक्यात देखिल अनेक वर्षांच्या नंतर होऊ घातलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत देखिल कार्यकर्त्यांना उमेदवारीचे डोहाळे लागणार असून, यामध्ये शेतकऱ्यांना देखिल निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची संधी मिळाल्याने आता बाजार समितीच्या निवडणुकीचे रणांगण चांगलेच तापणार आहे.

बाजार समितीवर सत्तारांचे वर्चस्व

-समितीवर मंत्री अब्दुल सत्तार यांची एकहाती सत्ता होती. त्यांचे वर्चस्व असल्याने, आता पुन्हा बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी ते कोणत्या पद्धतीने नियोजन करतात याकडे लक्ष असणार आहे. कारण सिल्लोड बाजार समितीमध्ये सोयगाव बाजार समितीचे विलीनीकरण झाले आहे. विलीनीकरणानंतर बाजार समितीची पहिली निवडणूक आहे. त्यामुळे पुढील राजकीय प्रवास सोपा करण्यासाठी ही निवडणूक म्हणजे रंगीत तालीम ठरणार आहे. भाजप सोबत राज्यातील सत्तेत असलेल्या सत्तारांना तालुक्यात मोठा विरोधक भाजपच आहे. त्यामुळे आता भाजपचे पदाधिकारी बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने कशी तयारी करतात हे बघावे लागणार आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच लागू शकतो. यावेळी शेतकऱ्यांना बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सेवा संस्था या मतदार संघातून निवडणूक लढविता येणार आहे. त्यासाठी शेतकरी ज्या मतदारसंघातून अर्ज दाखल करणार आहे. त्या मतदारसंघातील रहिवासी तसेच त्याच्याकडे कमीत कमी दहा गुंठे जमीन शेतकऱ्यांच्या नावे असावी लागणार आहे.

- ज्ञानेश्वर मातेरे, प्रशासक, सहायक निबंधक सहकारी संस्था, सिल्लोड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफी; आता रकमेची मर्यादा नव्हे सातबाराच होणार कोरा! राज्यातील २४.७३ लाख शेतकऱ्यांकडे ३५,४७७ कोटींची थकबाकी

सोलापूर शहर पोलिसांची कारवाई! स्वयंघोषित ‘दादा’ 8 दिवसांसाठी होणार तडीपार; महापालिका निवडणुकीपूर्वी ‘या’ गुन्हेगारांची पोलिस ठाण्यांकडून मागविली माहिती

Morning Breakfast Recipe: कुठल्याही पूर्वतयारीशिवाय १५ मिनिटांत सकाळी नाश्त्यात बनवा पेरी पेरी कबाब, सोपी आहे रेसिपी

अग्रलेख - शेजारचा आजार

Railway Station Renamed: महत्त्वाची बातमी! रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातील 'या' रेल्वे स्थानकाचे नाव बदललं; कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT