aurangabad school exam  sakal
छत्रपती संभाजीनगर

पहिली ते नववीच्या परीक्षाच्या तारखा जाहीर, शिक्षण अधिकाऱ्यांची माहिती

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी सर्व व्यवस्थापनाच्या शाळेत ३० एप्रिलपर्यंत प्रत्यक्ष शिकवण्याचे नियोजन यापूर्वीच करण्यात आले

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पहिलीपासून शाळा सुरळीत सुरु आहेत. त्यामुळे पहिली ते नववीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर घेण्याचा ठराव मराठवाडा मुख्याध्यापक संघाने मांडला. १५ एप्रिलपर्यंत शिक्षकांच्या शंभर टक्के उपस्थितीत पूर्णवेळ शाळा भरून अध्ययनक्षती भरून काढावी, त्यासाठी ३० एप्रिलपर्यंतचा प्रत्यक्ष शिक्षणाचा सूक्ष्म कृती आराखडा शाळांना शिक्षण विभाग व डायटकडून देण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी दिली.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी सर्व व्यवस्थापनाच्या शाळेत ३० एप्रिलपर्यंत प्रत्यक्ष शिकवण्याचे नियोजन यापूर्वीच करण्यात आले आहे. दरवर्षी पहिली ते नववीच्या परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जातात. त्यानंतर पुढील २० ते २५ दिवस निकालाची प्रक्रिया सुरु असते. त्यासाठी दरवर्षी मार्चअखेर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होऊन पुढील २० दिवस निकालाची प्रक्रिया सुरू असते. यंदा मात्र कोरोना काळात विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत प्रत्यक्ष शिक्षण व त्यानंतर परीक्षा घेण्याचे नियोजन करण्याचा ठराव मराठवाडा मुख्याध्यापक संघाने मांडला आहे.

शिक्षकांची हवी शंभर टक्के उपस्थिती

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे सर्व शाळात शंभर टक्के शिक्षकांची उपस्थिती असावी. तसेच पूर्णवेळ शाळा भरतात की नाही, याची पडताळणी करावी. सूचना न पाळणाऱ्या शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावावी, अशा सूचना शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना झालेल्या बैठकीत दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Kolhapur Student Death Case : बाबा दुप्पट फायदा मिळणार आहेत, पैसे पाठवा..., मुलीचे शेवटचे शब्द, कुटुंबीयांनी नाकारलं विद्यार्थिनीने नको ते केलं

तारिणी केदारला मनातल्या भावना सांगणार, प्रेमाची कबुली देताच मोठा अनर्थ घडणार, प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले...

IPL Schedule Change: IPL च्या सामन्यांमध्ये होणार मोठी वाढ! पण कधीपासून? अरुण धुमल यांनी जाहीर केलं वर्ष!

Enforcement Directorate: EDची ताकद वाढणार! १२०० पेक्षा जास्त पदांवर होणार भरती, जागांमध्ये मोठी वाढ; केंद्र सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT