covid 19
covid 19 covid 19
छत्रपती संभाजीनगर

'औरंगाबादमधील तब्बल चार लाख नागरिकांना कोरोनाचा धोका'

माधव इतबारे

औरंगाबाद: कोरोना ससंर्गाची दुसरी लाट ओसरत असली तरी शहरातील तब्बल चार लाख नागरिकांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत संसर्गाची (covid 19 third wave auranagbad) ऑगस्ट महिन्यात भीती आहे, असे मत महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी व्यक्त केले. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या कमी होत आहे. असे असले तरी तिसऱ्या लाटेची भिती कायम असून, त्यासाठी महापालिकेने आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे.

यासंदर्भात विचारणा केली असता प्रशासक श्री. पांडेय म्हणाले, शहरात १८ वर्षावरील नागरिकांची संख्या दहा लाख आहे. त्यापैकी तीन लाख ४० हजार नागरिकांनी लशीचे एक किंवा दोन्हीही डोस घेतले आहेत. एक लाख नागरिकांना कोरोना संसर्ग झालेला आहे. सुमारे दीड लाख नागरिक कोरोनाचे लक्षणे नसलेले रुग्ण होते. याचा एकत्रित विचार केला तर सुमारे सहा लाख नागरिकांच्या शरीरात अँटिबॉडिज निर्माण झाल्या आहेत, त्यांना कोरोना संसर्गाची शक्यता कमी आहे. उर्वरित चार लाख नागरिकांना तिसऱ्या लाटेत कोरोना संसर्ग होऊ शकतो.

ऑगस्ट महिन्यात शहरात कोरोनाचे रुग्ण वाढतील असा अंदाज आहे. त्यामुळे लग्न, सभा-समारंभांवर निर्बंध कायम आहेत. एकूण क्षमतेच्या पन्नास टक्के उपस्थितीत हे कार्यक्रम घेता येतील. अंत्यविधीसाठी निर्बंध आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेण्यात आले आहे, त्या कर्मचाऱ्यांना ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेत जेवढे रुग्ण आढळून आले, तिसऱ्या लाटेत एवढे रुग्ण नसतील, असे पांडेय म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT