Guardian Minister of Aurangabad Subhash Desai  
छत्रपती संभाजीनगर

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले

सुषेन जाधव

औरंगाबाद: उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी (ता.२५) रोजी जिल्ह्यातील वैजापूर तालूक्यातील हनुमंतगाव, महालगाव आणि गंगापूर तालुक्यातील वाहेगाव या ठिकाणी नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (पोकरा),  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत फळबाग लागवड, ठिबक व तुषार सिंचन, शेततळे, शेततळे अस्तरीकरण, कांदाचाळ आदी योजनेतील कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. 

मात्र कृषी विभागाने जाणिवपूर्वक केवळ बहूभुधारक शेतकरी आणि संबंधित योजनांच्या लाभार्थ्यांच्या भेटी घडवून आणल्या, परंतू यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांशी संवाद का घडवून आणला नाही? अल्पभूधारकांना शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांपासून चार हात दूरच का ठेवले असा संतप्त सवाल करत शेतकऱ्यांनी कृषी विभागावर संताप व्यक्त केला आहे. 

या पाहणी दरम्यान त्यांच्यासोबत आमदार रमेश बोरनारे, आरोग्य सभापती अविनाश गलांडे पाटील, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवर, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, उप विभागीय कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांच्यासह महसूल, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला वैजापूर तालुक्यातील हनुमंतगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतीत असलेल्या शेती शाळेला मंत्री देसाई यांनी भेट देऊन प्रात्यक्षिकाची पाहणी केली. 

त्यानंतर वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे संपत शेळके यांच्या शेतातील शेततळ्याची पाहणी केली. बांधावर खते, बियाणे पुरवठा या मोहिमेतंर्गत येथील शेतकरी गटांनी खरेदी केलेल्या खताच्या गाडीस पालकमंत्री श्री. देसाई यांनी हिरवी झेंडी दाखवली. गंगापूर तालुक्याच्या वाहेगावातील संपत मनाळ यांच्या शेतातील पिकांची पाहणी, वाहेगाव येथील मच्छिंद्र मणाळ यांच्या कांदा चाळीला भेट देऊन पाहणी केल्यानंतर वृक्षारोपन करण्यात आले.

हा हव्यास कशासाठी?

साधारण १५ दिवसापूर्वी कृषी विभागाने औरंगाबाद जिल्हा बांधावर खत वाटप करण्यात राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याचे स्पष्ट केले होते, मात्र त्यानंतर काही दिवसातच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्र्यांना पून्हा बांधावर खत वाटप करण्याच्या मोहिमेला हिरवी झेंडी दाखविण्यास भाग पाडले. हा हव्यास कशासाठी हा प्रश्‍न शेतकऱ्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : आंबेगावमध्ये आंदेकर टोळीचा खुनाचा कट उधळला; भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई

Jarange and Vikhe Patil: उपोषण सोडण्याची घोषणा करण्याआधी जरांगेंनी विखेंना नेमके कोणते प्रश्न विचारले?

Latest Marathi News Updates: मराठा आरक्षणासाठी शिंदे समितीनेही उत्तम काम केले - एकनाथ शिंदे

Manoj Jarange : मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी ! जरांगे पाटलांनी जीआर स्वीकारत सोडले उपोषण; भावूक होत म्हणाले- आज सोन्याचा दिवस

Manoj Jarange : मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या वारसांबाबत जरांगेंची 'ही' मोठी मागणी; सरकारने घेतला तात्काळ निर्णय

SCROLL FOR NEXT