harsul lake sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar News : शहरवासीयांना दिलासा! हर्सूल तलावातून उपसणार जास्त पाणी

अनेक वर्षांपासून पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या शहरवासीयांना २०२४ मध्ये काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - अनेक वर्षांपासून पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या शहरवासीयांना २०२४ मध्ये काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंतच्या १९३ कोटींच्या पुनरुज्जीवन योजनेचे काम प्रगतिपथावर असतानाच हर्सूल तलावातून पाण्याच्या उपशामध्ये जानेवारी महिन्यात वाढ होणार आहे. सुमारे साडेसात एमएलडी जास्तीचे पाणी रोज या तलावातून मिळेल, त्यामुळे जुन्या शहराला दिलासा मिळणार आहे.

शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळित आहे. जुन्या दोन्ही पाणी योजनांचे आयुष्य संपल्यामुळे वारंवार तांत्रिक बिघाड निर्माण होत आहे. त्यामुळे २,७४० कोटी रुपयांची योजना शासनाने मंजूर केली असली तरी या योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी डिसेंबर २०२४ उजाडणार आहे.

शहराला तातडीने दिलासा मिळावा यासाठी जुनी ७०० मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन बदलून त्याठिकाणी नवी ९०० मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन टाकण्यासाठी राज्य शासनाने १९३ कोटींचा निधी मंजूर केला आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी नऊ महिन्यांचा वेळ देण्यात आला.

त्यानुसार काम प्रगतिपथावर असून, पुढील वर्षात म्हणजे फेब्रुवारीपासून या योजनेतून अतिरिक्त पाणी शहराला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यासोबतच आता हर्सूल तलावातूनदेखील वाढीव पाणी मिळणार आहे.

हर्सूल तलावातून सध्या जुन्या शहरातील १६ वॉर्डांना पाणीपुरवठा केला जातो. या तलावातून रोज साडेसात एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जात होता. पण, शहराची पाण्याची गरज लक्षात घेत जास्तीचे पाणी उपसण्यासाठी नवीन यंत्रणा उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. सध्याच्या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता कमी असल्याने त्याशेजारीच नवीन जलशुद्धीकरण केंद्र तयार केले जात आहे. हे काम दिवाळीनंतर पूर्ण होण्याची शक्यता होती.

पण, आता डिसेंबरअखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल, असे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता के. एम. फालक यांनी सांगितले. त्यामुळे जानेवारीपासून हर्सूल तलावातून जास्तीचे पाणी उचलले जाईल, असे त्यांनी नमूद केले. जुन्या शहरासाठी हर्सूल तलाव मोठा आहे. या निर्णयामुळे काही अंशी नागरिकांची गैरसोय टळणार आहे.

उपसा जाणार १५ एमएलडीपर्यंत

तलावातून सध्या साडेसात एमएलडीपर्यंत पाणी उपसले जाते. नवीन जलशुद्धीकरण केंद्राचे काम झाल्यावर त्यात साडेसात एमएलडी पाणी शुद्धीकरण केले जाईल. त्यामुळे १४ ते १५ एमएलडी पाणी हर्सूल तलावातून प्राप्त होईल, त्यामुळे जुन्या शहराला दिलासा मिळणार आहे. साडेसात एमएलडी म्हणजे ७५ लाख लीटर. या तलावात सध्या १५ फूट पाणीसाठा आहे. या तलावाची क्षमता २७ फूट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT