छत्रपती संभाजीनगर

शेतकरी, बेरोजगांरासाठी राज ठाकरेंनी  मोर्चा काढायला हवा होता - इम्तियाज जलील 

शेखलाल शेख

औरंगाबाद : राज ठाकरे यांना मुंबईत काढलेला महामोर्चा जर शेतकरी, बेरोगार तरुणांच्या प्रश्‍नावर काढला असता तर अधिक बरे झाले असते. पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना देशातून हाकलायलाच पाहिजे, याबद्दल कुणाचे ही दुमत असू शकत नाही; पण केवळ राजकीय स्वार्थासाठी मोर्चा काढून लोकांना वेठीस धरण्यासाठी केलेली ही स्टटंबाजी आहे अशा शब्दांत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली.

मुंबईत मनसेच्या वतीने पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात महामोर्चा काढण्यात आला. खासदार इम्तियाज जलील म्हणाले, ""पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना राज्यातून, देशातून हाकललेच पाहिजे. आमचीही तीच भूमिका आहे; पण त्यासाठी मनसेला मोर्चा काढण्याची गरज नव्हती.

मुंबईत कुठे? किती घुसखोर आहेत? याची माहिती आपल्याला असल्याचे त्यांनी भाषणात सांगितले होते. मग त्याच घुसखोरांचा व्हिडिओ सत्ताधारी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला दाखवून हे काम करता आले असते; पण शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका सोडली. त्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी केलेला राज ठाकरेंचा हा सगळा खटाटोप असल्याची टीकासुद्धा इम्तियाज जलील यांनी केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray Statue Vandalised : मीनाताईंच्या पुतळ्यावर रंगफेक; ठाकरेंची शिवसेना आक्रमक, मुंबईत तणाव वाढला

Pune News : अंगणवाड्यांची धोकादायक स्थिती; बालशिक्षण धोक्यात; दाटीवाटीत मुलांचे शिक्षण, सुरक्षिततेचा प्रश्न

Share Market मध्ये नुकसान झालं नाशिकच्या दोन पठ्ठ्यांनी असा मार्ग निवडला की पोलिसांनीही डोक्याला हात मारला; नेमकं काय घडलं?

Robbery At SBI Bank : स्टेट बँकेच्या शाखेवर पिस्तूल, चाकूने धमकावून दरोडा, आठ कोटींचा ऐवज लुटला, पोलीस घटनास्थळी दाखल

Navratri 2025 Do's and Don'ts: शारदीय नवरात्रात काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT