छत्रपती संभाजीनगर

योगी, ठाकूर यांनाही जाब विचारावा 

शेखलाल शेख

औरंगाबाद : आठवडाभरापूर्वी झालेल्या सभेतील वारीस पठाण यांचे विधान वेगळ्या पद्धतीने मीडियाने सादर करणे, त्यावरून गदारोळ करणे योग्य नाही. पठाण यांच्या विधानाचे एमआयएम समर्थन अजिबात करीत नाही; पण त्यांच्या विधानावरून आम्हाला प्रश्न विचारणाऱ्यांनी किंवा माफी मागायला सांगणाऱ्यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्लीत केलेल्या ‘देश के गद्दारो को गोली मारो सालो’ आणि योगी आदित्यनाथ यांनाही जाब विचारावा, असे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

एनआरसी व सीसीए विरोधातील जाहीर सभेत बोलताना पठाण यांनी वादग्रस्त विधान केले होते. यावरून आता राज्यभरातून एमआयएमवर टीकेची झोड उठली जात आहे. यासंदर्भात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी (ता. २०) औरंगाबादेत माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले.

इम्तियाज जलील म्हणाले, ‘‘आठवडाभरापूर्वीचे हे विधान मीडियाने शोधून चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. देशातील जातीयवादाला खतपाणी घालणाऱ्या, समाजा-समाजांमध्ये फूट पाडणाऱ्या कुठल्याही वक्तव्याचे एमआयएम किंवा या पक्षाचा कुठलाही नेता समर्थन करीत नाही. पठाण यांनीही केलेले विधान हे त्या भावनेतून केले नव्हते, हे त्यांनी मुंबईत स्पष्ट केले आहे.

एनआरसी, सीसीएच्या विरोधात देशात दोन महिन्यांपासून आंदोलने, निदर्शने सुरू आहेत; मात्र सरकार त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जातोय; पण देशातील नागरिकांना आंदोलन करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे.

सरकार दखल घेत नसेल तर रागाच्या भरात एखादे चुकीचे विधान निघू शकते. आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी वेळोवेळी पक्षातील नेत्यांना याबाबत ताकीद दिलेली आहे. पठाण यांनी स्वतः हे विधान करण्यामागे त्यांचा हेतू वाईट नव्हता, असे स्पष्ट केले आहे. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : कोयना धरणात 24 तासांत 3.90 TMC पाण्याची आवक! 67 टीएमसीचा टप्पा पार, महाबळेश्वर-नवजात मुसळधार; पाहा आजची ताजी आकडेवारी

जितेंद्र यांनी विकत घेतलेला 4.25 लाखांना बंगला, आज त्याची किंमत 450 कोटी, जितेंद्र यांची मास्टरस्ट्रोक डील

Latest Marathi Update : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी जंतर-मंतरवर दाखल

Satara Loan Waiver: सातारा जिल्ह्यात ५४ हजार खाती कर्जमुक्तीकडे; बॅंकांमधील माहिती पोर्टलवर अपलोड, ५६९.४० कोटी होणार माफ

IND vs ZIM, T20I: 'Vaibhav Sooryavanshi ने चूका सुधारण्यावर लक्ष दिले असेलच, त्यामुळे...' श्रेयस अय्यरचे मोठे विधान

SCROLL FOR NEXT