छत्रपती संभाजीनगर

अध्यक्ष महोदय मी ज्या मतदारसंघातून येतो तेथे सात दिवसाआड पाणी मिळते

शेखलाल शेख

औरंगाबादः शहराला पाणी पुरवठा करणारे जायकवाडी जलाशय शंभर टक्के भरले आहे. गेट उघडून पाणी सोडले जात आहे तर दुसरीकडे औरंगाबाद शहरातील नागरीकांना सात आणि नऊ दिवसानंतर पाणी मिळत आहे. ७० वर्ष झाली तरी नागरीकांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे केंद्र शासनाने औरंगाबादचा ‘हर घर जल’ यामध्ये समावेश करुन शहरातील पाण्याची समस्या सोडवावी असा मुद्दा खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेत उपस्थितीत केला आहे.

इम्तियाज जलील लोकसभेत म्हणाले की, मी ज्या मतदासंघातून येतो तेथे सात दिवस किंवा नऊ दिवसानंतर पाणी मिळते. या वर्षी चांगला पाऊस झाला आहे शहराला ज्या ठिकाणाहुन पाणी पुरवठा केला जातो ते जायकवाडी धरण शंभर टक्के भरले आहे.

मात्र येथील जायकवाडीचे पाणी ५५ किलोमीटर अंतरावर असलेल्या औरंगाबादेत पुरेशा प्रमाणात आणले जात नाही. आज गेट उघडुन पाणी नदीत सोडले जात आहे. मात्र शहराला सात दिवसानंतर पाणी मिळत आहे. औरंगाबादसाठी शासनाने १६८० कोटी रुपयांची योजना तयार केली आहे.

आज ७० वर्षानंतर सुद्धा शहराला सात दिवस, नऊ दिवसानंतर पाणी मिळत असेल तर ही चांगली बाब नाही. केंद्र शासनाने हर घर जल ही योजना आखलेली आहे. त्यासाठी केस स्टडी म्हणून आपण औरंगाबाद शहराला यात घ्यावे. येथे योजना तयार करुन पुढील दीड वर्षात शहराला दररोज पाणी मिळेल असे प्रयत्न करावे या शहराल या योजनेच्या माध्यमातून आम्ही पुरेसे पाणी दिले असे दाखवता येईल.

मी हात जोडुन विनंती करतो की सात दिवसानंतर जर लोकांना पाणी मिळत असेल तर आपल्यासाठी ही लाजीरवाणी बाब आहे. सात दिवसानंतर पाणी येत असल्याने महिलांना सुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: रिषभला जसं बाद केलं तसंच करायला गेले, पण सहावेळा तोंडावर आपटले; इंग्लंडची चूक भारताच्या पथ्यावर Video

Pune News: माेठी बातमी! 'संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा'; पुरंदर-हवेली मतदारसंघात खळबळ

Solapur: राष्ट्रवादीच्या दोन जिल्हाध्यक्षपदाचा तिढा सोमवारी सुटणार?; बळिराम साठे ज्येष्ठ नेते शरद पवारांना भेटणार

Tarachand Agarwal CA Final: मानलं बॉस...! ७१व्या वर्षी पास करून दाखवली कठीण 'CA' परीक्षा अन् स्वप्न पूर्ण केलंच

ENG-U19 vs IND-U19: भारतीय कर्णधाराचे इंग्लंडमध्ये दमदार शतक; १४ चौकार अन् २ षटकारांसह इंग्लंडच्या गोलंदाजांना रडवले

SCROLL FOR NEXT