14IndiGo0_20airlines 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादहून दिल्लीसाठी आता १५ सप्टेंबरपासून दररोज विमानसेवा

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : औरंगाबादहून १५ सप्टेंबरपासून दिल्लीसाठी रोज उड्डाण करण्याचा निर्णय इंडिगोने घेतला आहे. त्यामुळे दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेत वाढ होणार आहे. कोरोनामुळे मार्चपासून विमानसेवा रद्द करण्यात आल्या होत्या. तब्बल तीन महिन्यांनंतर १९ जूनपासून अखेर इंडिगोने दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली या हवाई मार्गावर उड्डाण सुरू केले.

आठवड्यातून तीन दिवस हे विमान उड्डाण घेत आहे. त्यानंतर १५ जुलैपासून इंडिगोकडूनच हैदराबादसाठीही विमानसेवा सुरू करण्यात आली. आठवड्यातून चार दिवस हे विमान ‘टेकऑफ’ घेत होते. हैदराबाद येथे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.

त्यामुळे १९ ऑगस्टपासून हैदराबादसाठी रोज उड्डाण सुरू करण्यात आले. आता इंडिगोने दिल्लीसाठीही १५ सप्टेंबरपासून रोज उड्डाण करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उद्योजक सुनीत कोठारी यांनी दिली. सध्या औरंगाबादहून इंडिगोची औरंगाबाद-दिल्ली, औरंगाबाद-हैदराबाद आणि एअर इंडियाची औरंगाबाद-दिल्ली विमानसेवा सुरू आहे.
 

राष्ट्रीय सन्मान पुरस्काराचे वितरण
शीलादेवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जालनातर्फे राष्ट्रीय सन्मान पुरस्कार सोमवारी (ता. सात) सहाजणांना वितरित करण्यात आले. यात प्राध्यापक डॉ. देविदास बामणे (पेण, जि. रायगड) यांना राजर्षी शाहू महाराज आदर्श शिक्षक सन्मान, मनवर बाबूभाई मेघजीभाई (बागासार, जि. अमरेली, गुजरात) यांना महात्मा जोतिबा फुले आदर्श शिक्षक, प्राध्यापक डॉ. ज्ञानेश्वर महाजन (मंठा, जालना) यांना तात्यासाहेब महात्मा जोतिबा फुले आदर्श शिक्षक, प्रा. डॉ. प्रकाश साळवे (जालना) यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शिक्षक, प्रा. डॉ. उदय भोईर (औरंगाबाद) यांना कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक व डॉ. अमित कुमार दीक्षित (कोलकाता, पश्चिम बंगाल) यांना रामचंद्र शुक्ल साहित्यकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉ. रमाकांत आपरे, अध्यक्ष डॉ. स्वप्नील आपरे, उपाध्यक्ष शीला आपरे, प्राध्यापक डॉ. नंदकिशोर माळशिखरे, प्रा. स्वाती देशपांडे, सीमा भोईर यांची उपस्थिती होती.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT