Shetkari Sanghatana Baithak Aurangabad News  
छत्रपती संभाजीनगर

फडणवीस असो की ठाकरे सरकार,  शेतकऱ्यांच्या माफीची औकात आहे का? (शेतकरी संघटनेच्या बैठकीत सूर) 

सुषेन जाधव

औरंगाबाद : शेतकरी घाम गाळून पिकवितो. त्याचा दाम त्याला मिळालाच पाहिजे. फडणवीस असो की ठाकरे सरकार, कर्जमाफी या गोंडस शब्दाच्या नावाखाली शेतकऱ्यांना माफ करण्याची औकात आहे का? करायची तर कर्जमुक्ती करा, असा सूर शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बुधवारी (ता.15) निघाला. औरंगाबादेतील गांधी भवनमध्ये ही बैठक पार पडली. यावेळी काही ठरावही घेण्यात आले.

शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेच्या बैठकीला अध्यक्ष रघुनाथ पाटील, कालिदास आपेट, ऍड. अजित काळे, महिला कार्यकारिणी अध्यक्षा विमल आकणगिरे (रेणापूर), शिवाजी नाना नांदखिले, बंडू सोळंके, बाळासाहेब पटारे, दत्ता कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. 

...तर शरद पवारांनी माफी मागावी 
बैठकीदरम्यान उपस्थित रघुनाथदादा पाटील म्हणाले, की कितीही आघाड्या केल्या, सत्ता मिळविली; पण अजूनही शेतकऱ्यांचे आम्ही भले करू शकलो नाही, असे म्हणत शरद पवार यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. कॉंग्रेसच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्या झाल्याचेही त्यांनी टीकास्त्र सोडले. केवळ राजकीय पक्षांना दोष देण्यापेक्षा शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी संघटन करण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली. 

केंद्र सरकारच्या ई-नाम या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करवून घेणे, बळिराजा पक्षातर्फे राज्यभर निवडणुका लढविणे आणि सातबारा कोरा करण्याची पूर्तता न झाल्याने; तसेच फसवी कर्जमाफी केल्याविरोधात आंदोलने करून त्याचा लाभ मिळविणे; तसेच दोन कारखान्यांतील 25 किलोमीटरची अट रद्द करण्यासाठी लढा उभारणे या ठरावांचा समावेश आहे. 

शेतकी कर्जाचे लक्ष्यच अपूर्ण 
कालिदास आपेट म्हणाले, की रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशानुसार शेतकी कर्ज 19 टक्के असायला हवे; मात्र यंदा केवळ नऊ टक्के शेतकी कर्ज दिल्याचा आकडा आहे. श्री. अपेट यांनी शरद जोशींचा दाखला देत माफी ही गुन्हेगारांना करतात, शेतकरी कसला गुन्हेगार आहे असा जाब सरकारला विचारणार असल्याचे बैठकीत सांगितले. मुळात कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती द्या, असा संघटनेचा दावा असल्याचेही ते म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वनतारा'मध्ये घेऊन गेलेल्या 'महादेवी'ला परत आणण्यासाठी ताकदीने लढा; मुनिश्री आदित्यसागर यांचे राजू शेट्टी, प्रतीक पाटलांना आवाहन

Explained: तुम्हालाही जास्त अक्रोड खाण्याची सवय आहे का? मग होऊ शकतात 'हे' दुष्परिणाम

मुंबईत मुसळधार! ट्रॅकवर पाणी, लोकल ट्रेनचं वेळापत्रक कोलमडलं; अनेक भागात साचलं पाणी

Latest Marathi News Updates : मराठा समाजानंतर आता बंजारा समाज आरक्षणासाठी आक्रमक; बीडमध्ये आज विराट मोर्चा

Showroom fire: 'साेलापूरातील सिद्धी सुझुकी अन्‌ बजाज शोरूमला भीषण आग'; धूर पाहून वॉचमनने दाखविली तत्परता, अंदाजे ३५ ते ४० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT