cotton
cotton sakal
छत्रपती संभाजीनगर

जालना : आष्टीत कापसाला आठ हजारांचा भाव

सकाळ वृत्तसेवा

आष्टी (जि.जालना) : परतूर तालुक्यातील आष्टी येथील बाजारपेठेत खासगी कापूस व सोयाबीनची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरु आहे. दरम्यान, मंगळवारी (ता.२६) कापसाला ८ हजार ते ८ हजार हजार दोनशे रुपये भावाने तेजी आली. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी सणापूर्वी मोठा दिलासा मिळाला आहे.


परतूर तालुक्यातील आष्टी भागात मागील महिनाभर पडलेल्या पावसाने हाहाकार केल्याने खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी कापसाच्या उत्पादनात निम्याहून अधिक घट झाली. दरम्यान कापूस वेचणी, सोयाबीनची काढणी यावर दुप्पट खर्च होत आहे, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. शेतमाल पदरात पडताच विक्रीसाठी बाजारपेठेत आणत आहेत. येथील व्यापाऱ्यांनी खासगी खरेदीसाठी सरसावले आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत कापसाला चांगला भाव मिळत आहे. येथे मंगळवारी कापसाला ८ हजार दोनशे रुपये विक्रमी भावात खरेदी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार झाला आहे.

सोयाबीनच्या भावात घसरण
आष्टी येथील बाजारात सोयाबीनचे भाव कमालीचे घसरले आहेत. महिन्यापूर्वी ११ हजारावर गेलेले सोयाबीनचे भाव आता चक्क ४ हजार ते ५ हजारावर आले. त्यातच माऊश्चरचे कारण पुढे करून सोयाबीनची कमी दराने खरेदी व्यापाऱ्यांकडून होत आहे. विशेष म्हणजे येथील बाजार समिती अंतर्गत मोंढा यार्डात बीट पद्धतीने शेतमालाची खरेदी-विक्री सुरु होण्याची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत. यार्डात बीट पद्धतीने शेतमालाची खरेदी विक्री झाल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल अशी खात्री आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

Crude Oil Prices: पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी! कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घट

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT