khavlya manjar 
छत्रपती संभाजीनगर

कोट्यावधी रुपयांच्या खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्यांना पकडले, वन विभागाची कारवाई

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: सिल्लोड वन विभागाच्या अजिंठा वन परिक्षेत्रातून खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या नऊ जणांना बुधवारी (ता.३) वन विभागाने ताब्यात घेतले. खवल्या मांजराची सुटका करण्यात आली. (अंदाजे चार कोटी रुपये किंमतीचे हे मांजर आहे) विशेष म्हणजे जागतिक वन्य जीव दिनी ही करावाई करण्यात आली आहे. यामुळे या परिक्षेत्रात वन्य जीव सुरक्षित नसल्याची बाब पुन्हा समोर आली आहे. 

एक वन्यजीव प्राण्याची तस्करी करण्यात येत असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली. त्यानुसार सिल्लोड-अजिंठा रोडवरील हॉटेल लाडली जवळ नाके बंदी करण्यात आली. यावेळी आलेल्या एक वाहनातून (एम एच २० बीवाय ७३०७) मधून संशयस्पद हालचाली दिसून आल्या. यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहनातील लोकांची अधिक चौकशी केली असता, हे लोक अनाड शिवारात खवल्या मांजर असून त्यांची विक्री करीता जात असल्याचे सांगितले. तेव्हा वन विभागाने सापळा रचत अनाड येथून एका कापडी पिशवीत ठेवलेल्या मांजर आणि तीन अरोपींना ताब्यात घेतले.

या कारवाईत नऊ आरोपींसह एक चारचाकी, दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे. या नऊ जणांविरोधात भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उप वनसंरक्षक सुर्यकांत मंकावार, सहाय्यक वनसंरक्षक डी.आर. वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भिसे, वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद गायके, वनपरिक्षेत्र अधिकारी स्टाईक फोर्स यांच्या संयुक्त ही कारवाई करण्यात आली आहे.कारवाईसाठी वाइल्ड लाइफ वॉर्डन सातारा येथील रोहन भाटे यांचे विशेष सहकार्य लाभले . पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भिसे करीत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT