जाधववाडी : दोन आठवड्यापासून पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. २० ते ३० रुपये किलो मिळणारे वांग्यांनी शंभरी गाठली आहे. त्याला शेवगा शेंगांचीही साथ मिळाली असून, किलोचे दर शंभरी पुढे आहेत. बाजार समितीच्या मंडईत इतरांपेक्षा ३० ते ४० टक्के भाजीपाला स्वस्त मिळतो. असे असतानाही बाजार समितीत भाजीपाल्याचे दर वाढल्याने किरकोळ बाजारातही भाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. नवीन भाजीपाला येईपर्यंत हा दर कायम राहील, असे समितीतर्फे सांगण्यात आले. रविवारी (ता.२४) जाधववाडी मंडईत भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती.
बाजारात पालेभाज्यांसह इतर फळभाज्यांचे दरात चढ-उतार असते. दोन आठवड्यात कांद्याची आवक कमी झाल्याने कांदा ६० ते ८० रुपये किलोने विक्री झाला होता तर लसूण ३०० रुपये प्रतिकोलने विक्री झाला. आता वाढलेल्या भाजीपाल्यांच्या किमतीत कांद्याची आणि टोमॅटोच्या किंमत कमी झाल्या आहेत. यात कांदे २० ते २५ रुपये किलोने विक्री होत आहे. बाजारात नवीन बटाटा आल्यामुळे बटाट्याचे दरही कमी झाले आहे. बटाटे २० रुपये किलोने रविवारी बाजार समितीत विक्री झाले.
वांगे १०० रुपये किलो, शेवगा-१००, भेंडी ८०, मिर्ची ५० ते ६० रुपये किलोने विक्री झाले. १८ ते २४ डिसेंबर दरम्यान बाजार समितीत ५०० क्विटंल बटाट्याचे आवक झाली. परपेठेतून बटाट्याचे २६ ट्रक व आयशर दाखल झाले. त्यासह सफरचंदाची सहा वाहनांतून १०० क्विटंल आवक झाली. जवळपास नऊ वाहनांतून दोन लाख नारळाचा आवक झाली. यासह दहा मोठ्या वाहनातून दोन लाख नग अननसाची आवक झाली. तसेच ६० ते ७० वाहनांतून पालेभाज्याही आवक झाल्याची माहिती बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
फुलांना चांगली मागणी
झेंडूच्या फुलांचा आवक वाढली. किलोला ४० ते ६० रुपये भाव आहे. ॉशेवंती, गुलाब यांना चांगला दर मिळत आहे. झेंडू सोडता इतर फुलांना मागणी चांगली आहे.
इतर फळ बाजारात काय?
बाजारात पेर, सीताफळ, बोर विक्रीला दाखल झाले आहेत. गेल्या दोन आठवड्यापासून थंडी वाढल्यामुळे बोर, पेरू, आणि सीताफळाची विक्री घटली आहे. यात वटाणा शेगा मागणी होत आहे. मात्र, दिवाळीपासून नव्या सीताफळाची आवक मोठ्या प्रमाणावर होते. यंदाही बाजार समितीत सीताफळ चाळीस ते ५० रुपये किलोने विक्री झाली. पपई वीस रुपये किलोने विक्री झाली. पेरू ३० रुपये ते ४० रुपयांनी विक्री झाले. त्यासह नव्याने मोसंबी बाजार दाखल होत आहे. तिला किरकोळ मध्ये ५० ते ६० रुपयांचा दर मिळत आहे. नागपूरच्या संत्रीही ३० ते ५० रुपये दराने विक्री झाली. चिकूही बाजारात चांगलाच भाव खाताना दिसून आला. किलोमागे ५० ते ५५ रुपयांचा दर चिकूला मिळत आहे.
सफरचंदाला जेमतेम मागणी
पावसाळा संपल्यानंतर विविध फळांची आवक सुरू होते. यंदाही बाजारात विविध फळांची आवक सुरू झाली. यात काश्मीरमधून येणाऱ्या सफरचंदाची आवक जेमतेम होती. फारशी मागणी नसल्याने व्यापाऱ्यांनी या आठवड्यात केवळ पाच ते सहा ट्रक सफरचंद आणले. दर १५० रुपये पासून ते २०० रुपयांपर्यंत गेले आहेत. सध्या मागणी जेमतेम असली तरी, त्या आणखी वाढ होणार असल्याची माहिती सफरचंद विक्रेत्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.