Rain In Marathwada, Aurangabad News
Rain In Marathwada, Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्यात पावसाची रिपरिप कायम; सर्वच जिल्ह्यात हलका, मध्यम पाऊस

शेखलाल शेख

औरंगाबाद :  मराठवाड्यात पावसाची रिपरिप कायम असून सर्वच जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. मागील सहा दिवसांपासून बहुतांश ठिकाणी सुर्यदर्शन झालेले नाही. पावसाची सारखी झड सुरु असल्याने त्याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. समाधानकारक पाऊस असल्याने सर्वत्र प्रकल्प, तलाव भरले असून नदया खळखळुन वाहत आहे.


सोमवार (ता.१७) सकाळी सव्वा दहा वाजेपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात १७.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. तर बीड ३.८, हिंगोली ३०.९, जालना ३३.८, लातूर ५.९, नांदेड २५.९, उस्मानाबाद ३.९ तर परभणी जिल्ह्यात १०.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तसेच रविवार (ता.१६) रोजी सकाळी सव्वा दहा वाजेपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात १२.३, बीड ६.१, हिंगोली ९.५, जालना १३.२, लातूर ६.६, नांदेड १४.८,उस्मानाबाद ५.७ तर परभणी जिल्ह्यात ६.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.
वाचा : पीएचडी हवी द्या साठ हजार, मराठवाडा विद्यापीठातील अजब प्रकार


रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप
उजनी (जि.लातूर) ः परिसरात मागील चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, येथील रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप प्राप्त आले असून, प्रवाशांना मार्ग काढताना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने कसरत करावी लागत आहे.
येथील भारत कृषी भांडारच्या समोरील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचल्याचे दिसून येत आहे.

मागील अनेक दिवसांपासून याकडे ग्राम पंचायतीचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे खुद्द ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनासुद्धा याच रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. तरीही यावर उपाय करण्यात येत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. हा गावात प्रवेश करण्यासाठी हा मुख्य रस्ता असून, तो पुढे एकंबी, एकंबी तांडा, एकंबी वाडी, टाकळी, पाडोळी, समुद्रवाणी आदी गावांसह उस्मानाबाद व मुरुड शहरांना जोडला जातो. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची व वाटसरूंची वर्दळ दिसून येते. अनेक दिवसांपासून पाणी साचल्याने दुर्गंधी पसरून परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उजनी ग्रामपंचायतीवर नुकतीच प्रशासकाची नेमणूक झाली असून, त्यामुळे अशा प्रकारच्या प्रलंबित विकासकामांना गती येईल, अशी आशा ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

फोनवर बोलण्यात तरुणी एवढी मग्न होती की.. विषारी फूल खाल्ल्याने तडफडून झाला मृत्यू

IPL 2024 Points Table: 16 पाँइंट्स अन् केवळ तीनच पराभव, तरी कोलकाता-राजस्थानला अद्यापही का मिळालं नाही प्लेऑफचं तिकीट?

Google Wallet: गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Payपेक्षा कसे आहे वेगळे, करता येणार 'ही' महत्त्वाची कामे

Gaurav More : गुडबाय हास्यजत्रा ; गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप ; समीर दादा म्हणाला...

SCROLL FOR NEXT