नरेंद्र मोदी 
छत्रपती संभाजीनगर

'मोदी पुन्हा सत्तेत आल्यास देशाचे ऐक्य, प्रगती धोक्यात'

अकराव्या पंचवार्षिक योजनेत काँग्रेसने माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार आणि अन्नसुरक्षेचा अधिकार दिला. मात्र, हे लोकांपर्यंत घेऊन जाण्यात काँग्रेस अपयशी ठरली.

अतुल पाटील

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या सरकारची वाटचाल गोळवलकरांच्या विचारांवर सुरू आहे. मोदी पुन्हा सत्तेत आले तर देशाचे ऐक्य, प्रगती, सलोखा आणि स्वातंत्र्य धोक्यात येईल, अशी भीती अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर (Ecomics Expert Bhalchandra Mungekar) यांनी व्यक्त केली. लोकसंवाद प्रतिष्ठानतर्फे रविवारी (ता. सोळा) राज्यसभेचे माजी खासदार, नियोजन आयोगाचे माजी सदस्य आणि मुंबई विद्यापीठाचे (Mumbai University) माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे ‘वर्तमानातील राजकारण’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान झाले. संवादमालेच्या सुरवातीला कॉंग्रेसचे(Congress) दिवंगत खासदार राजीव सातव (Rajee Satav) यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. (Narendra Modi If Again Come Into Power, Nation Unity Will Be In Denger, Said Bhalchandra Mungekar)

डॉ. मुणगेकर म्हणाले, ‘अकराव्या पंचवार्षिक योजनेत काँग्रेसने माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार आणि अन्नसुरक्षेचा अधिकार दिला. मात्र, हे लोकांपर्यंत घेऊन जाण्यात काँग्रेस अपयशी ठरली. ही पोकळी मोदींनी भरून काढली आणि फायदा करून घेत सत्ता मिळवली. आता भारताची आर्थिक स्थिती २०१४ पासून घसरत आहे. नोटबंदीचा बेजबाबदार निर्णय मोदींनी घेतला. त्या दिवशी लोकांकडे १४ लाख कोटी रुपये रोख रक्कम होती. ती रक्कम त्यांच्या हातातून गेली. काळा पैसा, कॅशलेस इकॉनॉमी ही स्वप्नच राहिली. कोरोनाने अर्थव्यवस्थेला आणखीणच खड्ड्यात घातले.’ ममता बॅनर्जी (Mamta Banarjee) यांना मोडीत काढायचे या एकाच हेतूने मोदींनी बंगालमध्ये (West Bengal) ठाण मांडले. कोरोना संसर्गाच्या काळातही जाहीर सभा घेणे आणि कुंभमेळा भरवण्यास परवानगी देणे, ही घोडचूक असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकसंवादचे अध्यक्ष डॉ. राजेश करपे यांनी केले. सूत्रसंचालन संकेत कुलकर्णी यांनी केले. डॉ. कैलास अंभुरे यांनी आभार मानले.

मुसोलिनीच्या धर्तीवर संघाची रचना

संघाच्या सहाशे संघटना आणि साठ लाख स्वयंसेवक आहेत. त्या सर्वांच्या हातात काठ्या आहेत. हे सगळे मुसोलिनीच्या फॅसिस्ट संघटनेच्या धर्तीवर सुरू आहे. मोदींना या सगळ्याचे पाठबळ आहे. न्यायव्यवस्था कोसळली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पत्रकार परिषद घेऊन न्यायव्यवस्था धोक्यात असल्याचे सांगतात. या देशातल्या गरिबांचाही न्यायालयावर विश्वास आहे. तो ज्या दिवशी उडेल, तेव्हा अराजक माजेल, अशी भीती डॉ. मुणगेकर यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT