Sambhaji Nagar News
Sambhaji Nagar News sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : सातशे उंबऱ्यांच्या गावात ६५ डॉक्टर ; पैठणचे नवगाव ठरतेय आदर्श

सकाळ वृत्तसेवा

पाचोड : शिक्षणाचे महत्त्व पटल्याने वादविवाद टाळून संपत्ती मिळविण्याची स्पर्धा न करता पैठण तालुक्यातील नवगाव येथील ग्रामस्थ आपल्या पाल्यांना शिक्षणाचे बाळकडू देत आहेत. यामुळे अवघ्या सातशे उंबऱ्यांच्या गावातून ६५ डॉक्टर वैद्यकीय सेवा बजावत असून, १०३ शिक्षक ज्ञानार्जनाचे काम करतात. तालुक्यात नवगावची ‘डॉक्टरांचे गाव’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे. विद्यार्थी, तरुणांची शिक्षणासाठीची धडपड आणि त्यांच्या कुटुंबीयांचे प्रोत्साहन, ही गोष्ट आदर्शवादी मानली जात आहे.

गावात सर्व समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. गावाचे भौगोलिक क्षेत्र २ हजार २६४ हेक्टर असून, वहितीखाली लागवडीयोग्य क्षेत्र १ हजार ९०० हेक्टर आहे. गोदावरी नदीकाठामुळे परिसरात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. १ हजार ४०० हेक्टर क्षेत्र बारमाही बागायती क्षेत्र आहे. गावात जिल्हा परिषदेसह खासगी शैक्षणिक संस्था असून, ७२२ कृषी खातेदार आहेत. येथील ग्रामस्थांनी आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ६५ मुलांना जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या बळावर उच्चविद्याविभूषित करून डॉक्टर, तर १०३ जणांना शिक्षक, दोघांना कायदेतज्ज्ञ बनविले आहे. विशेष म्हणजे ६५ वैद्यकीय पदवीधरांत ३९ मुस्लिम तरुण-तरुणींचा समावेश आहे.

गावाचे नाव राज्यपातळीवर

आजपर्यंत गावातील २५ महिला आणि ४० पुरुषांनी वैद्यकीय पदव्या संपादन केल्या आहेत. यात एमबीबीएस ११, एमडी ४, बीएएमएस ८, बीएचएमएस ३३, डीएचएमएस २, बीडीएस ४ असे एकूण ६५ जण वैद्यकीय क्षेत्रात पदवीधर आहेत. गावात जवळपास बहुतांश जण पदवीधर असून, काही जणांनी राजकारणात राज्य स्तरावर नाव कमावले आहे. त्यात इब्राहिम पठाण, डॉ. गुलदाद पठाण, महंमद हनिफ, शेरूभाई पठाण, वहीद पठाण व डॉ. शरिफ पठाण यांची नावे प्रकर्षाने घेतली जातात.

गावातील सर्व नागरिकांना एकमेकांप्रति आपुलकी आहे. गावात क्षुल्लक कारणावरून वाद आणि बंद अद्याप झाल्याचे स्मरणात नाही. विशेषतः या गावांसह तुळजापूर व रामनगर ही संयुक्त सतरा सदस्यीय ग्रामपंचायत अस्तित्वात आहे. त्यामुळे आता गावाच्या विकासासाठी नवगावला स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण व्हायला हवी.

— डॉ. शरीफ पठाण, उपसरपंच

गावात संपत्तीपेक्षा शिक्षणाला महत्त्व देणारे लोक आहेत. आजच्या काळात शिक्षणाशिवाय पर्याय नाही. एकवेळ जेवायची भ्रांत कायम राहिली तरी चालेल, परंतु शिक्षणापासून कुटुंबातील सदस्य वंचित राहू नयेत, यासाठी सर्व जण काळजी घेतात. शिक्षणासाठी सर्व जण स्पर्धा करतात. आगामी काळात गावातून अनेक मुले-मुली अधिकारी होऊन गावाचे नाव उज्ज्वल करतील, हे तितकेच खरे.

— डॉ. गुलदाद पठाण, ग्रामस्थ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT