3crop_20loan_9
3crop_20loan_9 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद जिल्ह्यात एक हजार कोटींचे पीककर्ज वाटप, दोन लाखावर सभासदांना लाभ

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सर्व बँकानी पुढे येत शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यात २ लाख ९ हजार ५७९ सभासदाना १ हजार ८४ कोटी ३६ लाख रुपयांची पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. यातील बहुतांश बँकांनी उदिष्टापेक्षा जास्त कर्ज वाटप केल्याची माहीती लिड बँकेचे व्यवस्थापक श्रीकांत कारेगांवकर यांनी दिली.


महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा बँक, सर्वजनिक बँकाबरोबर व्यापारी बँकांतर्फे कर्जवाटपात आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील कर्जवाटप मराठवाड्यातील सर्वाधिक वाटप असल्याचेही श्री. कारेगावकर म्हणाले. जिल्ह्यात बँकांतर्फे कोरोनाचा काळातही बँकांनी शेतकऱ्यांचा विचार खरिपासाठीचे कर्जवाटप अंतिम टप्प्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९०.६१ टक्के कर्जवाटप झाले आहे. कर्ज वाटपात यात सर्वाधिक जिल्हा बँकेने वाटप केले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३९६ कोटी.३४ लाखाचे पीक कर्ज वाटप केले आहे. यासह बँक ऑफ महाराष्ट्राने १६१ कोटी कर्ज वाटप केले असेही कारेगांवकर यांनी सांगितले.


बँकेचे नाव------------ कर्जवाटप--------------------------टक्केवारी
जिल्हा मध्यवर्ती बँक--- ३९६ कोटी.३४लाख ------------९६
व्यापारी बँका------------८७ कोटी --------------------------५९.
महाराष्ट्र ग्रामीण बँक-----१७४ कोटी४८ लाख------------१५३
बँक ऑफ महाराष्ट्र------१६१ कोटी ------------ -----------१३०
बँक ऑफ बडोदा------- ४९ कोटी रुपये--------------------११०
बँक ऑफ इंडिया-------- २८ कोटी १८ लाख---------------- १३९
एकूण-----------१०८४ कोटी ३६ लाख-------- ९०.६१--- २ लाख ९ हजार ५७९- सभासद


वैजापूर तालुक्यात पावसाने गाठली सरासरी, जलसाठा समाधानकारक
सतत अवर्षणग्रस्त असणाऱ्या वैजापूर  (जि.औरंगाबाद) तालुक्यात यंदा वरुणराजाने जून महिन्याच्या सुरवातीपासूनच दमदार बॅटिंग केल्याने पावसाने तीन महिन्यातच वार्षिक सरासरी गाठली. यामुळे तालुक्यातील लघु व मध्यम प्रकल्पात समाधानकारक जलसंचय झाला आहे. शिवाय पावसाळा संपण्यास महिन्याभराचा अवधी शिल्लक असल्याने प्रकल्पांतील जलसाठ्यांत आणखीनही भर पडणार आहे.

आगामी काळात तालुक्यातील ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे काम कमी होणार असून रब्बी हंगामही जोमात राहणार असल्याचे संकेत मिळू लागले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारंगी मध्यम प्रकल्पातही पाणी साठ्यात वाढ होण्यास सुरवात केली आहे. प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता १३.२९० दलघमी इतकी असून क्षमतेच्या १९.१९ टक्के म्हणजेच ४.००२ दलघमी इतका जलसंचय प्रकल्पात जमा झाला आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: निवडणूक आयोगाची मोठी कारवाई! रत्नागिरीत तीन कोटींची रोकड पकडली

SCROLL FOR NEXT