Education Sakal
छत्रपती संभाजीनगर

विद्यार्थ्यांना शिक्षणाची हमी : स्थलांतरितांना सरकारचा दिलासा

शाळाबाह्य विद्यार्थी शिक्षणापासून दूर

संदीप लांडगे

औरंगाबाद : ऊसतोड, वीटभट्टी आदी कामानिमित्त स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची फरपट होते. परिणामी, विद्यार्थी शाळाबाह्य होऊन शिक्षणापासून दूर जातात. यासाठी शिक्षण विभाग शाळाबाह्य मुलांना स्थलांतरित होण्यापूर्वी शिक्षण हमी कार्ड देणार आहे. या हमी कार्डआधारे स्थलांतरित झालेल्या मुलांना त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश मिळणार आहे.

दरवर्षी साधारणतः ऑक्टोबरपासून वीटभट्टी, ऊसतोड मजुरांचे स्थलांतर सुरू होते. मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली या जिल्ह्यातून दरवर्षी सुमारे एक लाखांपेक्षा जास्त कुटुंब विविध कामांसाठी स्थलांतरित होतात. विशेषतः दुर्गम भागात ऑक्टोबरनंतर हाताला काम नसल्याने मजूर परजिल्ह्यात जातात. यावेळी पालकांसोबत स्थलांतरित होणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून हंगामी वसतिगृहे सुरू केली जाणार आहेत. अशा मुलांना हमी कार्ड देण्यात येणार आहे, त्यामुळे स्थलांतरित मुलांना त्या जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रवेश घेता येईल.

तपासणीचे काम सुरू

कोरोनामुळे गेले दोन वर्षे हंगामी वसतिगृहांची योजना राबविली नव्हती. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सरकारने ही योजना राबविण्यासाठी कंबर कसली आहे. स्थलांतरित मजुरांचा एकही पाल्य शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी सरकारकडून घेतली जाणार आहे.

प्रबंध पोर्टलची निर्मिती

शाळाबाह्य विद्यार्थ्यांना स्थलांतरित होण्यापूर्वी शिक्षण हमी कार्ड दिले जाणार आहे. यामुळे हा विद्यार्थी कुठल्या वर्गात आहे, कुठे शिक्षण घेत होता आदी शिक्षणासंबंधी माहिती मिळणार आहे. पालकाने रोजगारासाठी इतरत्र स्थलांतर केल्यास संबंधित ठिकाणी विद्यार्थ्याला सहज शिक्षणासाठी प्रवेश मिळेल.

तसेच यंदा कोणत्या ठिकाणी हंगामी वसतिगृह आहे, तेथे किती विद्यार्थी राहतात याची संपूर्ण माहिती जतन करण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘प्रोजेक्ट अप्रायझल बजेटिंग अचिव्हमेंट ॲण्ड डाटा हॅंडलिंग सिस्टिम’ (प्रबंध) तयार करण्यात आली आहे.

समिती स्थापन

परजिल्ह्यात स्थलांतरित झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोचविण्याची जबाबदारी संबंधित वीटभट्टीमालक, साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाकडे शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांच्याकडे राहणार आहे. यासाठी बीड, उस्मानाबाद, जालना, सातारा, सांगली येथील प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष औरंगाबाद विभागाचे उपसंचालक अनिल साबळे तर कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक महेश चौथे हे सहअध्यक्ष आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US War: होर्मुझमध्ये कडक नाकाबंदी; तरीही सुटका! जहाजांचे कॅप्टन इराण आणि अमेरिकेला कसा चकवा देतायेत? ५ गुप्त मार्ग उघड

MI vs CSK Live : संजू सॅमसनचे खणखणीत शतक! मुंबई इंडियन्सवर पडला भारी, IPL 2026 मधील 'Chetta'ची दुसरी Century

US Iran Tensions : युद्ध पुन्हा भडकणार? हॉर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी उडवण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकन नौदलाला आदेश

IPL 2026 News: दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात १८ वर्षांचा स्टार दाखल; T20 वर्ल्ड कप स्पर्धेत पठ्ठ्याने गाजवलेली एक मॅच, आता धमाल येणार

Solapur Crime News: जुन्या वादातून १८ वर्षीय सुजित राठोडचा खून; आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांचा मृतदेहासह पोलीस ठाण्यात ठिय्या

SCROLL FOR NEXT