Prakash Ambedkar visit to Aurangzeb tomb in Khuldabad says Aurangzeb rule of 50 years cannot be erased  
छत्रपती संभाजीनगर

Aurangzeb : 'औरंगजेबाने 50 वर्षे राज्य केलं ते कोणाला मिटवता येणार नाही'; प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य

रोहित कणसे

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील वेगवेगळ्या शहरात मिरवणूकीत औरंगजेबाचे फोटो झळकावल्यामुळे तसचे सोशल मीडियावर स्टेटस आणि पोस्ट ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

यादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खुल्ताबाद शहरातील औरंगजेबाच्या कबरीला आज, १७ जून रोजी भेट दिली. या भेटीनंतर आंबेडकरांनी पतिक्रियादेताना औरंगजेबाने पन्नास वर्ष राज्य केलं हे कोणला मिटवता येणार नाही अशी प्रतिक्रिया दिली.

औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यानंतर, नामांतरावरून सुरू असलेल्या वादवार आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, इथं भद्रा मारुतीचं मंदिर आहे. या मारुतीच्या मंदिराने देखील आम्हाला मदत केली आहे. त्यांना कसलाही आक्षेप नाहीये, त्यालाही मी असंच संध्याकाळी भेट देतो आहे.

भारताच्या दृष्टीकोनातून खुल्ताबाद हे एक ऐतिहासिक शहर आहे. याचा लोकांनी विचार करावा. नावावरून जो भांडण लावण्याचा प्रकार चालला आहे त्यांना एवढंच सांगतो की, औरंगजेबाने पन्नास वर्ष राज्य केलं ते कोणाला मिटवता येणार नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

राजकीय चर्चांना उधाण

प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटासोबत जवळीक साधण्याच्या प्रयत्नात आहे,यावरून काही दिवसांपासू दोन्ही पक्षात चर्चा देखील सुरू आहे. यादरम्यान आता आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर गेल्याने राजकीय वर्तुळात भोवया उंचावल्या आहेत. या भेटीवर राजकीय स्तरातून काय प्रतिक्रिया उमटणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT