औरंगाबाद : आंतरराज्य नदीजोड प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्र सरकारला मान्य असून आता गुजरात सरकारने अजून अंतिम मान्यता दिलेली नाही. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी येथे दिली.
हेही वाचा : ऐतिहासिक चित्रपटासाठी तारतम्य आवश्यक !
महोत्सवातील विजेत्यांचा गौरव करण्यासाठी आयोजित पारितोषिक वितरण कार्यक्रम सोमवारी (ता. दहा) श्री. पाटील यांच्या उपस्थितीत झाला. तत्पूर्वी पत्रकारांनी मराठवाड्याच्या पाणीप्रश्नांच्या अनुषंगाने उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी म्हटले, की नाशिक जिल्ह्यातून पश्चिमेकडे जाणारे पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि आम्ही लक्ष घातले आहे. त्यांनी बराच वेळ दिला आहे.
हेही वाचा : निकम साहेब.. हे जेवण मीच बनवलेय ना!
आम्ही त्यावर काम करीत आहोत. उजनी धरणाचे पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी निधी उपलब्ध करून देतो आहोत. कृष्णेचे उस्मानाबादसाठी 7 टीएमसी पाणी देण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. आंतरराज्य नदीजोड प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्राला मान्य झालेला आहे. आता केवळ गुजरात सरकारने मान्य करायचा आहे. त्यानंतर या कामाला वेग येईल, यासाठी देखील आमचे प्रयत्न सुरू आहेत.''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.