sambhaji nagar  Sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : शहरातील पाणीपुरवठ्याच्या स्वनिधीसाठी मार्ग काढा ; शासनाशी चर्चा करून उपाययोजना करण्याचे खंडपीठाचे निर्देश

शहरातील पिण्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या खर्चातील महापालिकेचा स्वनिधी हिस्सा ८२२ कोटी रुपये उभारण्यास महापालिकेने असमर्थता दर्शविली आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पिण्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या खर्चातील महापालिकेचा स्वनिधी हिस्सा ८२२ कोटी रुपये उभारण्यास महापालिकेने असमर्थता दर्शविली आहे. ही स्वनिधीची रक्कम राज्य शासनाने उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी वकिलांनी नगरविकास खात्याचे प्रधान सचिव आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी आणि मुख्यमंत्र्यांनी हा निधी उपलब्धतेसाठी उपाययोजना करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी आज दिले.

शहरासाठीच्या या पाणीपुरवठा योजनेचा समावेश सुधारित मंजुरीनुसार केंद्र शासनाच्या अमृत २ योजनेत समावेश केला असून याचा खर्च २,७४०.७५ कोटी रुपये निश्चित करण्यात आला आहे. यात केंद्र शासनाचा वाटा २५ टक्के म्हणजे ६८५.७९ कोटी, राज्य शासनाचा वाटा ४५ टक्के म्हणजे १२३३ .३४ कोटी आणि महानगरपालिकेचा वाटा ३० टक्के म्हणजे ८२२.२२ कोटी असा निश्चित करण्यात आला. यात केंद्र आणि राज्य मिळून ९८१.६५ कोटी रुपये प्राप्त झाले असून, यातून योजनेचे ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

या पाणीपुरवठा योजनेच्या कामासंदर्भात दाखल जनहित याचिकेवर गुरुवारी (ता.१८) झालेल्या सुनावणीत महापालिकेतर्फे ॲड. संभाजी टोपे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, या संदर्भात १३ जुलै २३ रोजीच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्वनिधी उभारण्यास महापालिका असमर्थ ठरत आहे. मात्र, योजना रेंगाळू नये यासाठी राज्य शासनाने हा निधी उपलब्ध करण्यासंदर्भात सुचविले होते.

मात्र, ९ जानेवारी २४ रोजीच्या कक्ष अधिकारी यांच्या पत्रानुसार, हा निधी देण्यास स्पष्ट नकार कळविला. या योजनेचे काम आधीच खूप रेंगाळले आहे. शहराला गेल्या २० वर्षांपासून सहा ते सात दिवसांआड पाणीपुरवठा होतो आहे. आधीच्या समांतर पाणीपुरवठा योजनेप्रमाणे ही योजनाही रेंगाळण्याची भीती असल्याने राज्य शासनाने हा निधी द्यावा यासाठी सरकारी वकिलांनी प्रधान सचिव, नगरविकास आणि हे खाते अखत्यारित असलेले मुख्यमंत्री यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांना सर्व परिस्थिती निदर्शनास आणावी.

राज्य शासनाने हवे तर टप्या टप्प्याने दहा ते वीस वर्षात किंवा शासन ठरवेल त्यानुसार वसूल करावे व यातून मार्ग काढण्याचे निर्दश खंडपीठाने दिले गुरुवारच्या सुनावणीत महाराष्ट्र जीवन प्राधि करणाकडून ज्येष्ठ विधिज्ञ आर. एन. धोर्डे, ॲड. विनोद पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. राजेंद्र देशमुख, मूळ याचिकाकर्ते ॲड. अमित मुखेडकर, महापालिकेकडून ॲड. संभाजी टोपे, सरकारकडून मुख्य सरकारी वकील अमरजितसिंग गिरासे यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT