पाचोड (ता.पैठण, जि.औरंगाबाद) : ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने बागांमध्ये पाणी साचले आहे. Heavy Rain Hit Paithan Taluka of Aurangabad District
छत्रपती संभाजीनगर

शद्बांपेक्षा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हवीय मदत, आश्वासन बस्स!

गणेश पिटेकर

औरंगाबाद : राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) म्हणतात, मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसान भरपाई देणे शक्य नाही. ठिक आहे. पण त्यांच्या हक्काचे जे आहे ते तरी त्यांना द्या. मुंबईत बसून मराठवाड्यातील अतिवृष्टीने (Rain Hit Marathwada) जे मोठे नुकसान केले आहे त्याची दाहकता कळणार नाही. दुसरे अनेक ठिकाणी अद्यापही नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. ती तातडीने करावे. सर्व बाजूंनी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना आज आधार देण्याची गरज आहे. या भागातील शेतकरी (Farmers) नुकसान भरपाई लवकर मिळावी यासाठी रस्त्यावर उतरत आहे. जालन्यातील घनसावंगत शेतकऱ्यांनी हलगी मोर्चा काढून तहसील कार्यालयाला घेराव घातला होता. तसेच औंढ्यात सिद्धेश्वर धरणाचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी औंढा-जिंतूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले होते.

त्यांना लवकर नुकसान भरपाई हवी आहे. शेतकरी संघटनेच्या वतीनेही आंदोलन करण्यात आले आहे. पोकळ शद्बांचे आश्वासन नको आहे. त्यांना भरीव मदत करण्याची गरज आहे. या अतिवृष्टीत माणसांबरोबर जनावरांचाही मृत्यू झाला आहे. अशा अतिवृष्टीने कमीत-कमी जीवित हानी होईल यावर काम करण्याची गरज आहे. मराठवाड्यात पाणी, पर्यावरणावर काम करणारे अनेक तज्ज्ञ आहेत. त्यांची मदत घ्यायला हवी. शासनाने संवेदनशीलता दाखवून लवकर अतिवृष्टीग्रस्तांना सर्व प्रकारची मदत करायला हवे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT