water supply 
छत्रपती संभाजीनगर

तीन तास औरंगाबाद शहराचा पाणी उपसा बंद, चार दिवसांत दोनदा संकट

गेल्या चार दिवसांत दोन वेळा शहराचा पाणी तीन-तीन तास बंद राहिल्याने पाण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे.

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरावरील पाणी संकट कायम आहे. गेल्या चार दिवसांत दोनवेळा शहराचा पाणी तीन-तीन तास बंद राहिल्याने पाण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. शहराच्या पाणी पुरवठ्यात तांत्रिक अडचणीमुळे वारंवार अडथळे येत आहेत. त्यात गेल्या चार दिवसांत जायकवाडी धरणातून दोन वेळा पाणी उपसा बंद झाला. औरंगाबाद (Aurangabad) महापालिकेच्या यांत्रिकी विभागाने सोमवारी तीन तास शटडाऊन घेतला होता. त्यामुळे पाणी उपसा राहिला. त्यामुळे अनेक वसाहतींमधील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसाने पुढे गेले. त्यात बुधवारी पाणी योजनेचा वीजपुरवठा तीन तास खंडीत झाला. त्यामुळे दोन्ही योजनांद्वारे होणारा पाणी उपसा बंद राहिला. (Three Hours Water Pumping For Aurangabad City)

पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी सांगितले की, चार दिवसांत दोन वेळा पाणी उपसा बंद राहिल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सिडको, लक्ष्मी कॉलनी, हनुमान टेकडी, नागेश्वरवाडी या उंचावरील भागांना एक दिवस उशिराने पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. (Water Supply In Aurangabad)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन, वयाच्या ४८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jalgaon News : पाचोरात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार, २५० गुरे वाहून गेली, असंख्य गावे पाण्याखाली

Hockey Tournament: 'चीनमधील स्पर्धेत सातारकर खेळाडूंची चमकदार कामगिरी': हॉकीपटू वैष्णवी, ऋतुजाचे ‘चक दे इंडिया’; भारतीय संघाचे यश

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2025

Suryakumar Yadav : खिलाडूवृत्तीपेक्षा भावना महत्त्वाच्या; हस्तांदोलन टाळण्यावरून सूर्यकुमारचे स्पष्ट मत, नेमकं काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT