2Aurangabad_Municipal_Corporation_0 
छत्रपती संभाजीनगर

खामनदी पात्रातील दोनशे कुटुंबांना हलवले, औरंगाबाद महापालिकेने शाळेत केली राहण्याची व्यवस्था

माधव इतबारे

औरंगाबाद : शहर परिसरात शुक्रवारी रात्री (ता.२५) झालेल्या पावसामुळे हर्सुल तलावातील पाणी पातळी वाढल्याने खामनदीला पूर आला. त्यामुळे नदी पात्रात अतिक्रमण करून राहणाऱ्या सुमारे दोनशे कुटुंबांची धावाधाव झाली. महापालिकेने शनिवारी (ता. २६) सकाळी या कुटुंबांना एका शाळेत सुरक्षित स्थळी हलवले.


शहर व परिसरात शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे हर्सुल तलावातून पाण्याचा विसर्ग मोठ्याप्रमाणात वाढला व खाम नदीला पूर आला. त्यामुळे नदीपात्रावर असलेल्या जलाल कॉलनी, हिलाल कॉलनी, आरेफ कॉलनी या भागातील नागरिकांची तारांबळ उडाली. या भागात नदीच्या पात्रात नागरिकांनी अतिक्रमणे करून घरे बांधली आहेत. पाण्याचा प्रवाह वाढल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली.

महापालिकेने देखील यापूर्वीच नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची तयार केली होती. त्यानुसार वॉर्ड क्रमांक चारच्या पथकाने तातडीने धाव घेऊन मदत करण्याचा प्रयत्न केला. पण रात्रीमुळे मदत करता आली नाही. दरम्यान शनिवारी सकाळी शहर अभियंता सखाराम पानझडे, वॉर्ड अधिकारी नंदकिशोर भोंबे यांच्यासह अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पात्रात सुमारे दोनशे अतिक्रमण असल्याने त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रगती कॉलनी येथील महापालिकेच्या शाळेत स्थलांतरित होण्यास सांगण्यात आले. काही नागरिकांनी किंमती साहित्यासह शाळेत बस्तान मांडले. अनेक जण नातेवाइकांकडे राहण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले.

पाण्याचा प्रवाह केला मोकळा
हर्सूल तलाव ओव्हारफ्लो झाल्यापासून खाम नदीपात्रातील अतिक्रमणांचा विषय गाजत आहे. अतिक्रमण हटाव विभागाने वारंवार पाहणी केली. मात्र अतिक्रमणे हटविण्यात आले नाहीत. दरम्यान आज जेसीबी मशीन आणि पोलकेनच्या साहाय्याने नदी पात्रातील पाण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला, घरांचे बांधकाम न पाडता आजूबाजूचे बांधकाम हटवून हे काम करण्यात आल्याचे नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात व्होटचोरी करून निवडून आला भाजप आमदार? राहुल गांधींनी आकडेवारीच मांडली

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयोगाच्या आतूनच काही सूत्रं आम्हाला माहिती पुरवू लागले

Pune Crime : कोथरुडमध्ये गोळीबार; गाडीला साईड न दिल्याचा वाद की काहीतरी मोठं?

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT