Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबादेतील कोविड 19 चा संसर्ग झालेल्या दोन नवीन रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. हे दोन्ही रुग्ण समतानगर येथील असून, काच आणि फर्निचरचे काम करणाऱ्या 38 वर्षीय कोरोनाबाधित कारागिराच्या संपर्कात आले होते. 

त्यामुळे या आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 38 झाली असून, प्रत्यक्षात 18 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 38 पैकी पाच जणांचा   मृत्यू झाला, तर 15 रुग्ण बरे झाले आहेत. यातील एक घाटी रुग्णालय, पंधरा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. समतानगर येथे आढळून आलेल्या या दोन पॉझिटिव्ह रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचेही ते म्हणाले. 

हे दोन्ही नवीन रुग्ण समता नगर येथीलअसून एक  52 पुरुष व दुसरा 25 तरुण आहेत. त्यामुळे आता समता नगर येथील संख्या पाचवर गेली आहे. हा भाग आता हॉटस्पॉट ठरला आहे. 

समतानगरात काच व फर्निचर काम  करणारा 38 वर्षीय कारागीर सर्वप्रथम कोरोनाबाधित झाला होता. त्याच्या संपर्कात आल्याने येथीलच 18 वर्षीय आणि 20 वर्षीय तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे. आता आणखी दोघांना लागण झाल्याचे चाचणी अहवालानंतर स्पष्ट झाले. आता या भागातील रुग्णांची संख्या पाचवर गेली आहे, असेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. 

औरंगाबाद कोरोना मीटर 

  • एकूण रुग्णसंख्या -38
  • कोरोनामुळे मृत्यू - 05
  • उपचार घेत असलेले -18 रुग्ण
  • बरे होऊन घरी गेलेले रुग्ण -15

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंनी तिसऱ्यांदा मागितली परवानगी, फक्त ५० जण, वेळ पाळणार आणि शांततेत आंदोलन; मुंबई पोलिसांना दिलं हमीपत्र

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबई प्रवासात विशेष सुरक्षा पथक तैनात

Latest Marathi News Update : कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही...: राज ठाकरेंच्या टीकेचा रोष कोणाकडे

Rishi Panchami 2026: ऋषिपंचमीला नांगर न लागलेल्या रानभाज्यांचा नैवेद्य का दाखवला जातो? जाणून घ्या धार्मिक अन् वैज्ञानिक कारण!

Police Officer Death: अचानक प्रकृती बिघडली अन् रक्ताची उलटी झाली; २५ वर्षीय महिला पोलिसाची मृत्यूशी झुंज अपयशी

SCROLL FOR NEXT